ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला तर WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मालिकेतील अखेरची कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली किंवा २-२ अशी ड्रॉ झाली तर त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागले. असे झालेच तर भारताला अशी प्रार्थना करावी लागेल की श्रीलंका २ पैकी किमान १ लढत गमावेल. न्यूझीलंडसारख्या मजबूत संघाविरुद्ध विजय मिळवणे श्रीलंकेसाठी अवघड असेल तेही त्यांच्याच घरच्या मैदानावर.
ऑस्ट्रेलियासाठी समीकरण स्पष्ट आहे. WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना भारताविरुद्धच्या २ पैकी एका लढती पराभवापासून वाचायचे आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची मालिका ३-० किंवा ३-१ अशी जरी गमावली तरी ते अंतिम फेरीत पोहोचतील. जर ऑस्ट्रेलियाचा ४-० असा पराभव झाला तर श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २-० असा विजय मिळवावा लागले. असे झाले नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होईल. ही लढत ७ जून पाहून इंग्लंडमधील ओव्हर मैदानावर होईल.
भारताने जण अंतिम फेरीत प्रवेश केला तर WTCच्या फायनलमध्ये सलग दोन वेळा पोहोचणारा तो पहिला संघ ठरेल. या आधी आयसीसीच्या पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत देखील भारत पोहोचला होता. मात्र तेव्हा टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times