मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेनंतर आता दोन्ही संघात उद्या १७ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता टीम इंडियाची नजर वनडे मालिका जिंकण्याची असेल.

या वर्षी भारतात आयसीसी वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघ पूर्ण ताकद पणाला लावतील. पण टीम इंडियासाठी ही मालिका कसोटी प्रमाणे सोपी आणि सहज असणार नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाचे भारताविरुद्धचे रेकॉर्ड तितके तगडे आहे. त्यामुळे भारताला प्रत्येक आघाडीवर ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाने २०१९मध्ये झालेल्या वनडे मालिकेत भारताचा घरच्या मैदानावर पराभव केला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेआधी श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट; फक्त ODI नाही तर…
दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या लढतींच्या आकडेवारीवर नजर टाकली तर १४३ वडनेत ऑस्ट्रेलियाने ८० लढतीत विजय मिळवला आहे तर भारताला ५३ लढतीत विजय मिळवता आलाय. भारतात झालेल्या वनडे मॅचचा विचार केल्यास ६४ पैकी ३० लढती ऑस्ट्रेलियाने तर २९ लढती भारताने जिंकल्या आहेत.

ही फार जुनी गोष्ट नाही जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारतीय मैदानावर भारताचा पराभव केला होता. २०१९ साली वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा ३-२ असा पराभव केला होता. तेव्हा पहिल्या दोन लढती जिंकल्यानंतर भारताने मालिका गमावली होती. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने २ शतकांसह ५ सामन्यात ३८३ धावा केल्या होत्या. तर भारताकडून विराट कोहलीने ३१० धावा केल्या होत्या, ज्यात २ शतकांचा समावेश आहे.

LLC Masters 2023: निवृत्तीनंतर कोण असं खेळतं? बॅटिंग पाहून पाकिस्तानी गोलंदाजांनी हात जोडले
कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल असे पिच तयार करण्यात आले होते. ज्याचा फायदा टीम इंडियाला झाला. पण वनडेत असे फार वेळा घडत नाही. वनडे मॅच अधिक रोमांचक होण्यासाठी फलंदाजांना अनुकूल असे पिच तयार केले जाते. जेथे फिरकींना जास्त संधी मिळत नाही. अशात भारताला ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करावा लागणार आहे. या शिवाय पहिल्या लढतीत कर्णधार रोहित शर्मा असणार नाही. तो दुसरी आणि तिसरी वनडे खेळणार आहे. सोबत स्टार फलंदाज श्रेयस अय्यर मालिकेतून बाहेर झाला आहे. आता त्याच्या जागी मधळ्या फळीत एक दमदार खेळाडू निवडावा लागले. गेल्या काही काळात श्रेयसने वनडेत दमदार कामगिरी केली होती.

Virat Kohli: विराटने व्यक्त केली भावना; द्रविडला म्हणाला, माझ्याच चुकांनी अपयशी ठरलो अन्…
वनडे मालिकेचे वेळापत्रक

पहिली मॅच- १७ मार्च, मुंबई
दुसरी मॅच- १९ मार्च, विशाखापट्टणम
तिसरी मॅच- २२ मार्च, चेन्नई

सर्व सामने दुपारी १.३० वाजता सुरू होतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here