विशाखापट्टणम: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स राखून जिंकला. त्यामुळे ही भारताची सर्वात धक्कादायक हार मानली जात आहे. कांगारु संघाने हा सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बराबरी साधली आहे. या सामन्यात संघाची गोलंदाजी फळी ढासळताना दिसलीच पण गोलंदाजही त्या सामन्यात विशेष कामगिरी करू शकले नाही. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल प्रश्न विचारताच त्याने त्याच्या अनुपस्थितीवर एक मोठे वक्तव्य केले आहे.

दरम्यान या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचल स्टार्कने घातक गोलंदाजी करत ९व्यांदा एकाच सामन्यात ५ विकेट्स मिळवल्या तर सलामीवीर फलंदाज मिचल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी प्रत्येकी नाबाद ५१ धावा केल्या आणि १२१ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला १० विकेट्सने विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले . तर दुसरीकडे हा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने बुमराहच्या अनुपस्थितीत असं वक्तव्य केल जे बुमराहच्या चाहत्यांना दुखावणारं आहे.
सूर्याला पहिल्याच चेंडूवर दोन वेळा कसं काय आऊट केलं, सामन्यानंतर समोर आली स्टार्कची रणनिती
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. नुकतीच जर्मनीमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झआली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा मैदानात उतरण्यासाठी ६-७ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. यामुळे तो आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ आणि वनडे विश्वतषकामधून बाहेर झाला आहे. जेव्हा रोहित शर्माला त्याच्याबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला की ‘बुमराह गेल्या ८ पेक्षा जास्त महिन्यांपासून बाहेर असल्याने प्रेक्षकांना आणि संघाला त्याच्याशिवाय खेळण्याची सवय झाली आहे. तरीसुध्दा बुमराहची जागा भरून काढणे खूप अवघड आहे. आम्हाला माहित आहे की तो किती अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे’.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

रोहित शर्मा पुढे म्हणाला कि ‘आम्हाला पुढे जायचं आहे आणि घेतलेली जबाबदारी खूप छान प्रकारे पार पाडत आहेत. संघाला मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांच्या व्यतिरिक्त उमरान मलिक आणि जयदेव उनादकटही भेटले आहेत’.

सध्या दुसऱ्या सामन्यात पदरी पडलेल्या पराभवासाठी रोहितने फलंदाजांना जबाबदार ठरवलं आहे. त्यांच्या मते जर फलंदाजांनी चांगली खेळी खेळली असती तर कदाचित निकाल भारताच्या बाजूने लागला असता. तो म्हणाला की, दुसऱ्या वनडे सामन्याची खेळपट्टी अनुकूल होती मात्र आम्ही विरोधी संघापुढे मोठं लक्ष्य ठेवण्यास आम्ही अयशस्वी ठरलो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here