नवी दिल्ली: राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून १६ महिन्यांत त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाचे पराभव आणि राहुल द्रविड यांची प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभव, आशिया चषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र न होणे आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत १० विकेट्सने पराभव हे सर्व द्रविड युगासाठी एखाद्या वाईट घटनेसारखंच राहील आहे. दुसरीकडे, भारताने घरच्या मैदानावर प्रत्येक मालिका जिंकणे आणि ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखणे यासारखे सकारात्मक गुणही आहेत.

द्रविड यांच्यावर सुरु असलेल्या प्रश्नांवर आणि त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल आता माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वक्तव्य केले आहे. द्रविडच्या आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री होते. रवी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडशी केलेल्या तुलनेवर एक वेगळंच वाक्य म्हटलं. ते म्हणाले की, त्यांच्या काळात टीम इंडिया दोनदा आशिया कप जिंकली होती. पुढे सांगताना ते म्हणाले – प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. त्याला (राहुल द्रविड) ही वेळ लागणार आहे, पण राहुलचा एक फायदा आहे की तो एनसीएमध्ये होता, तो अ संघासोबतही होता आणि आता तो इथेही आहे. बहुतेक खेळाडू त्याच्या काळातील आहेत.
लाचारीची हद्दच झाली; टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये येण्यासाठी शाहिद आफ्रिदीचा भारतावरच आरोप
शास्त्री यांनी लिजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्स दरम्यान स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी अनेक गोष्टींवर खुलेपणाने वक्तव्य केले. द्रविडचा करार यंदाच्या विश्वचषकासोबत संपुष्टात येणार आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. शास्त्री यांनी द्रविडचे समर्थन केले आणि आठवण करून दिली की भारतातील लोक फक्त ट्रॉफी जिंकण्याची पर्वा करतात. हे वाक्य स्पष्ट करण्यासाठी शास्त्री यांनी २०१६ आणि २०१८ च्या आठवणी सांगितल्या जेव्हा भारताने सलग दोनदा आशिया कप जिंकला.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

ते म्हणाले – “आपल्या देशात अनेक गोष्टी फार काळ लक्षात राहत नाहीत. जर तुम्हाला जिंकायचे असेल तर जिंकावेच लागेल. माझ्या कार्यकाळात आम्ही दोन आशिया चषक जिंकले, पण कोणालाच आठवत नाही. कोणी आशिया चषकाचा उल्लेख केला आहे का? आम्ही दोनदा जिंकलो आहोत. त्यावर कोणी बोलत नाही. मात्र आशिया चषक स्पर्धेत हरलो की चर्चा होते. का? म्हणूनच मी म्हणतोय, प्रयत्न नेहमीच असायला हवेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here