नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ()ने आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी कंपन्या न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक चीनमधील मोबाइल कंपनी व्हिवो असून त्यात कोणताही बदल केला जाणार नाही असे आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिरच्या बैठकीत ठरवण्यात आले. आता या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार विरोध होत आहे.

वाचा-
भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे लोकांच्यात चीनबद्दल प्रचंड राग आहे. सीमेवरील संघर्षात भारतीय जवान शहीद झाल्यापासून देशातील नागरिकांनी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकण्यास सुरूवात केली. आता लोकांनी बीसीसीआयच्या निर्णयावर हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावर इंडियन प्रिमियर लीगच्या ऐवजी चीनी प्रिमियर लीग म्हणून ट्रेंड सुरू झाला आहे.

वाचा- …

काहींनी सीमेवर शहिद झालेल्या जवानांचे फोटो शेअर केले आहेत. फक्त पैशासाठी तुम्ही (IPL) कोणत्याही थराला जाऊ शकता असे अनेकांनी म्हटले आहे.

RSSचा विरोध

आयपीएलच्या प्रायोजकावरून विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने लोकांना या टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

वाचा-
आयपीएलने चीनी कंपनीचे प्रायोजकत्व कायम ठेवून शहिद झालेल्या जवानांचा अपमान केल्याचे स्वदेशी जागरण मंचने म्हटलय. सध्याच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था बाजारातील चीनी वस्तूंपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनी गुंतवणूकदारांना आणि कंपन्यांना प्रवेश रोखला जात असताा आयपीएलने केलेले हे कृत्य देशाच्या सुरक्षेचा अपमान करणारे आहे, असे त्यांनी म्हटले. आयपीएलच्या आयोजकांनी चीनी कंपनीचे प्रायोजकत्व काढून घ्यावे नाही तर आम्हाला आयपीएलच्या बहिष्काराचे आवाहन करावे लागेल असे मंचने सांगितले.

वाचा-
येत्या १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये आयपीएलचा १३वा हंगाम सुरू होणार आहे. तर फायनल मॅच १० नोव्हेंबर रोजी खेळवली जाईल. या वर्षी एका दिवशी दोन सामने असलेले १० दिवस असतील. संध्याकाळी सुरू होणारे सामने भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता सुरू होतील.

या स्पर्धासाठी जैव वातावरण तयार करून देण्याची तयारी टाटा ग्रुपच्या टाटा मेडिकर अॅण्ड डायग्नोस्टिकने दाखवली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here