ICC प्रमाणे, BCCI ने आपल्या कोविड-१९ धोरणात सुधारणा केलेली नाही. ICC ने पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूंना देखील सहभागी होण्याची परवानगी देत असताना, BCCI ने खेळाडूंसाठी किमान ७ दिवसांचा विलीगीकरणाचा कालावधी अनिवार्य केला आहे. खेळाडूंची तीन वेळा चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. हा नियम त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील लागू होईल.
बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही सावध राहण्याच्या आणि मास्कशिवाय बाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला वेगळ्या आयसोलेशन रूममध्ये नेण्यात येईल. संपूर्ण टीम आणि कुटुंबातील सदस्यांची पुन्हा कोविड चाचणी केली जाईल. तथापि, सामना कोणत्याही अडचणीशिवाय पुढे जाईल.
अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस
ते पुढे म्हणाले, “घाबरण्यासारखे काही नाही. प्रत्येकाचे लसीकरण करण्यात आले असून त्यांचे बूस्टर डॉसही झाले आहेत. परंतु सावधगिरीचा उपाय म्हणून खेळाडूंना मास्क घालणे, मर्यादित संवाद इत्यादी सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. होय, आयसीसीने खेळाडूंना परवानगी दिली आहे परंतु तरीही आम्हाला वाटते की या प्रकरणात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडू कोविड पॉझिटिव्ह असताना खेळणार नाहीत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times