आयपीएल तोंडावर आलेली असताना चीनच्या विवो या कंपनीने बीसीसीआयबरोबराचा करार मोडीत काढला आहे. त्यामुळे आता एवढ्या कमी वेळात प्रायोजक आणायचा कुठून हा मोठा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे. कारण एवढ्या कमी वेळात एवढा मोठा करार करण्यासाठी कोणती कंपनी तयार होईल, असे काही जणांना वाटत नाही. पण बीसीसीआय सध्याच्या घडीला काही कंपन्यांबरोबर चर्चा करत आहे आणि योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण यावेळी काही कंपन्या आयपीएलला आधार देऊ शकतात, असे म्हटले जात आहे. पण सध्याच्या घडीला बीसीसीआय शांत बसणारी नक्कीच नाही. कारण जर प्रायोजकत्व मिळाले नाही तर बीसीसीआयला मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता बीसीसीआय नेमके कोणते पाऊ उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
चीनची विवो आणि आयपीएल यांच्यामध्ये २१९९ कोटी रुपयांचा पाच वर्षांसाठी करार झाला होता. त्यानुसार विवो दरवर्षी आयपीएलला ४४० कोटी रुपये देणार होती. हा करार २०१७मध्ये सुरु झाला होता. त्यामुळे आता या आयपीएलसाठी विवो कंपनी ४४०० कोटी आयपीएलला देणार होती. पण यावर्षीच्या आयपीएलमध्ये विवो या कंपनीने आपला करार मोडीत काढला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला नवीन प्रायोजक काही दिवसांतच शोधावा लागणार आहे.
आता आयपीएल तोंडवर आल्यावर विवोने आपण या वर्षी तरी आयपीएलला प्रायोजकत्व देऊ शकत नाही, असे म्हटल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे आता एवढ्या कमी कालावधी प्रायोजक नेमका कुठून आणायचा, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे. यावेळी बीसीसीआयने काही पर्यायांवर विचार सुरु केला असल्याचे समजते आहे. यापूर्वी प्रायोजकत्व घेतलेल्या आणि यापूर्वी त्यासाठी उत्सुक असलेल्या कंपन्यांबरोबर बीसीसीआय बोलणी करत असल्याचे म्हटले जात आहे.पण कोणती कंपनी यासाठी तयार होणार, हे मात्र कोडे सुटलेले नाही.
आयपीएलची यावेळी कोकाकोला या कंपनीबरोबर प्रायोजकत्व देण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. कोकाकोला कंपनीने आयपीएलला प्रायोजकत्व देण्यासाठी यापूर्वी उत्सुकता दाखवली होती, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय आता कोकाकोला या कंपनीबरोबर आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी चर्चा करत असल्याचे काही जणांनी म्हटले आहे.कारण जर कोकाकोलाबरोबर बीसीसीआयने करार केला तर त्यांना पेप्सिकोपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय कोकाकोला या कंपनीबरोबर करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.
आयपीएलला या वर्षी प्रायोजकत्व देण्यासाठी पेप्सिको ही कंपनी पुढे येऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण यापूर्वी आयपीएलचे प्रायोजकत्व या कंपनीकडे होते. ही कंपनी दरवर्षी आयपीएलला ३९६ कोटी रुपये देत होती. विवोने ही रक्कम ४४० कोटी रुपयांपर्यंत नेल्यावर पेप्सिकोचे प्रायोजकत्व संपुष्टात आले होते. या वर्षी आयपीएल सर्वात जास्त हिट होईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे पेप्सिको ही कंपनी या गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी आयपीएलला पुन्हा एकदा प्रायोजकत्व देऊ शकते, असे म्हटले जात आहे.
आयपीएलला जर कोणीही प्रायजोकत्व एवढ्या लवकर देत नसेल तर रिलायन्सची जिओ ही कंपनी पुढे येऊ शकते, असेही म्हटले जात आहे. कारण जिओने आपल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. त्याचबरोबर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना आयपीएलच्या प्रायोजकत्वाचा फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. रिलायन्स ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. त्याचबरोबर मुकेश यांची पत्नी नीता यांचा मालकीचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे परस्पर हितसंबंध यामुळे जपले जाणार की नाही, हे तपासून पाहावे लागणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
These are actually great ideas in concerning blogging.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.