आयपीएल खेळण्यासाठी युएईला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंना करोनाची चाचणी करावी लागणार आहे. पण आता आयपीएल सुरु असतानाही काही दिवसांनी खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे. आयपीएल सुरु असताना किती दिवसांनी खेळाडूंना करोनाची चाचणी करावी लागणार आहे, पाहा…

करोना चाचणीचा खेळाडूंच्या पाचवीलाच पुजली असल्याचे आता म्हटले जात आहे. कारण आयपीएल सुरु असतानाही खेळाडूंना करोना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. कारण खेळाडू प्रत्येक सामन्यामध्ये कोणाच्याही संपर्कात येऊ शकतात आणि त्यांना करोना होऊ शकतो. त्यामुळे आयपीएल सुरु असतानाही खेळाडूंना करोना चाचणी करावी लागणार आहे.

आयपीएल ही जवळपास दोन महिने चालणार आहे. पण खेळाडूंना आयपीएल सुरु असताना मात्र प्रत्येक पाच दिवसांनी करोना चाचणी करावी लागणार आहे. पाच दिवसांमध्ये एखादा संघ एक किंवा दोन सामने खेळणार आहे. या सामन्यांमध्ये जर खेळाडू करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला तर त्यालाही करोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे आयपीएल सुरु असतानाही खेळाडूंना प्रत्येक पाच दिवसांनी करोनाची चाचणी करावी लागणार आहे.

आयपीएल जर खेळायची असले तर प्रत्येक खेळाडूला करोना चाचणी करावी लागणार आहे. करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यावरच त्या खेळाडूला आयपीएल खेळण्यासाठी युएईला जायला मिळणार आहे. आयपीएल खेळायचे असेल तर प्रत्येक खेळाडूला करोना चाचणी करणे अनिवार्य आहे. करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यावरच त्या खेळाडूला आयपीएल खेळण्यासाठी युएईला जायला मिळणार आहे.

आयपीएलसाठी भारतामधून युएईला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. या १४ दिवसांमध्ये खेळाडू आपल्या रुममधून बाहेर पडू शकत नाही. फक्त जेव्हा खेळाडूला करोनाची चाचणी करायची असेल तेव्हाच तो आपल्या रुमच्या बाहेर पडू शकतो, असे म्हटले जात आहे. यावर्षी आयपीएल संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे. आयपीएल जर यशस्वी करायची असेल तर युएईमधील करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन बीसीसीआय आणि आयपीएल खेळाडूंना करावे लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here