मुंबई: आयपीएलच्या १६व्या हंगामातील पहिल्याच लढतीत मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध झालेल्या लढतीत मुंबईने १७२ धावांचे आव्हान दिले होते. उत्तरादाखल आरसीबीने विजयाचे लक्ष्य फक्त १६.२ षटकात आणि २ विकेटच्या बदल्यात पार केले. मुंबईच्या या पराभवानंतर एक मोठा प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे संघ आणखी किती वेळ बेंचवर बसलेल्या खेळाडूंचे करिअर वाया घालवणार? मुंबई संघाची सर्वात मोठी ताकत म्हणजे मैदानावर खेळणारे नाही तर राखवी म्हणजे बेंचवर बसलेल्या खेळाडूंमध्ये सामना जिंकून देण्याची ताकद आहे. पण मुंबईची हीच ताकद आता त्यांची डोकेदुखी ठरते की काय असे वाटू लागले आहे. मुंबईच्या बेंचवर बसलेल्या खेळाडूंमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा देखील समावेश आहे. अर्जुनला रणजी ट्रॉफीत मुंबई संघाकडून पदार्पणासाठी फार काळ वाट पाहावी लागली होती. त्यामुळे त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने शतक झळकावले आणि वडिलांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

IPL 2023: ती एकच गोष्ट अर्शदीपच्या डोक्यात गेली; Live मॅचमध्ये पाहा कोणाला आणि का दिली ठस्सन
आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना अर्जुनबाबत असेच होताना दिसते. गेल्या ३ हंगामापासून अर्जुन मुंबई संघात आहे. पण त्याला अजून पदार्पणाची संधी मिळाली नाही. या हंगामातील पहिल्या मॅचमध्ये अर्जुनला संधी दिली गेली नाही.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने लिस्ट ए च्या ३ सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या अर्शद खानला संधी दिली होती. इतक नाही तर नेहल वढेरा आणि रितिक शोकिन याला देखील अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जेसन बेरेनड्रॉफला संधी दिली. पण या यादीत कुठेही अर्जुनला स्थान मिळाले नाही. चाहत्यांना देखील यावर धक्का बसला. अर्जुन हा महान क्रिकेटपटूचा मुलगा आहे पण ही गोष्ट देखील नाकारता येणार नाही की तो कामगिरी करू शकत नाही.

IPL 2023: उत्साहाच्या भरात रवी शास्त्री काय बोलू गेले पाहा, हार्दिक पंड्या देखील गोंधळला
अहमदाबाद कसोटीत भारताविरुद्ध वनडे स्टाइलने शतक करणाऱ्या कॅमरून ग्रीन पहिल्या मॅचमध्ये कधी आला आणि कधी बाद होऊन गेला हे कळाले देखील नाही. त्याने ४ चेंडूत ५ धावा केल्या. ग्रीनसाठी मुंबईने १७ कोटी रुपये मोजले आहेत. त्याच्या या अपयशाची चर्चा झाली नसती तरच नवल. काही चाहत्यांनी सोशल मीडियावर थेट हाच प्रश्न उपस्थित केला की ग्रीनने ५ धावा केल्या तर अर्जुनमध्ये काय कमतरता होती.

लखनौचे नवाब धोनीला घरच्या मैदानावर देऊ शकतात धक्का; फक्त एका गोष्टीमुळे चेन्नईचे टेन्शन वाढलं
सोशल मीडियावर अर्जुनला संघात न घेतल्यावरून चर्चा सुरू झाली आहे. काहींच्या मते अर्जुन सोबत मुंबई रणजी संघात जे झाले तसेच आता देखील होत आहे, त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघ सोडावा. अर्जुनने तसा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटू नये.

मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव

गेल्या दोन हंगामात अर्जुनला मुंबई इंडियन्सने बेंचवर बसवले आहे. त्याच्या बाबत मुंबईच्या संघ व्यवस्थापनाचा प्लॅन काय आहे हे अद्याप कळू शकले नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर हेच यावर उत्तर देऊ शकतील. पण हे मात्र निश्चित आहे की मुंबईच्या सर्व चाहत्यांना अर्जुनला पुढील मॅचमध्ये खेळताना पाहण्याची इच्छा आहे. अर्थात मुंबई इंडियन्सकडून तसे कोणतेही संकेत मिळाले नाही. त्यामुळे आणखी काही मॅचमध्ये अर्जुन बेंचवरच दिसला तर धक्का बसणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here