मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांच्या यादीत बीसीसीआयचा पहिला क्रमांका लागतो. पहिला टी-२० वर्ल्डकप भारतीय संघानं पटकावला. कोणाच्या ध्यानीमानी नसताना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील युवा संघानं टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली. ललित मोदींनी आयपीएलची कल्पना मांडली आणि ती यशस्वी करून दाखवली. आयपीएलमधून बीसीसीआयनं दरवर्षी कोट्यवधींची कमाई सुरू केली. वर्षागणिक आयपीएलची लोकप्रियता वाढत गेली. बीसीसीआय अधिकाधिक श्रीमंत होत गेलं. खेळाडूंचंही नशीब पालटलं. जिथे प्रतिभेला व्यासपीठ मिळतं, ही आयपीएलची टॅगलाईन. आयपीएलमुळे अनेक प्रतिभासंपन्न खेळाडूंचं कौशल्य क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालं. मात्र आता आयपीएलच्या साम्राज्याला हादरा बसण्याची चिन्हं आहेत.आयपीएलची संकल्पना ललित मोदींची. बीसीसीआयनं त्यांच्या मागे संपूर्ण ताकद लावली आणि आयपीएल जगातली सर्वात श्रीमंत आणि यशस्वी स्पर्धा म्हणून नावारुपास आली. यानंतर जगभरात फ्रेंचाईजी क्रिकेटला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश, पाकिस्तानमध्ये फ्रेंचायजी लीग स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. यंदाच्या वर्षात यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतही टी-२० लीगचं आयोजन करण्यात आलं. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला. यानंतर आता सौदी अरेबिया सरकारनं टी-२० लीग सुरू करण्यासाठी ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी आयपीएलमधील फ्रेंचायजी मालकांशीदेखील संपर्क साधला आहे. IPL स्टार रिंकू सिंह गरीब मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देणार, १०० जणांसाठी मोफत हॉस्टेल सुविधा सौदी अरेबिया सरकारची योजना काय? ‘दी एज’नं दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबिया सरकारच्या प्रतिनिधींनी आयपीएलमधील संघ मालकांशी संवाद साधला आहे. आखाती प्रदेशात टी-२० फ्रेंचायजी लीग सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. या स्पर्धेला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग बनवण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी आयपीएल संघ मालकांशी संपर्क सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून सौदी सरकार या योजनेवर काम करत आहे.
मी कधी विचारच केला नव्हता… रिंकू सिंहच्या कामगिरीनं वडिलांचं उर भरून आलं
भारतीय क्रिकेटपटूंच्या सहभागीसाठीही प्रयत्न लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौदी सरकार भारतीय क्रिकेटपटूंच्या सहभागीसाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी सौदी सरकार बीसीसीआयशी संवाद साधू शकतं. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणताही भारतीय क्रिकेटपटू आयपीएलशिवाय परदेशात सुरू असलेल्या अन्य क्रिकेट लीगमध्ये खेळू शकत नाही. एखाद्या भारतीय खेळाडूला परदेशांमधील लीगमध्ये खेळायचं असल्यास त्याला बीसीसीआयसोबतचे संबंध पूर्णपणे तोडावे लागतात. त्यामुळे त्या खेळाडूसाठी टीम इंडियापासून आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांचे दरवाजे बंद होतात. बीसीसीआयचे नियम अतिशय स्पष्ट आणि कठोर असल्यानं सौदी सरकार त्यात बदल करण्याची गळ घालू शकतं.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times