टी-२० सुरू झाल्यापासून क्रिकेट जास्त वेगवान झाले आहे. क्रिकेटचे तिन्ही प्रकार भिन्न असले, तरी वन-डे त्या स्वरुपातील बदलाकडे लक्ष द्यायला हवे, असे सांगताना आपण यापूर्वीही २५ षटकांच्या डावाची संकल्पना मांडली होती, याकडे सचिनने लक्ष वेधले.
वन-डेच्या निकालात नाणेफेक निर्णायक ठरत आहे. दुसऱ्या डावाच्या वेळी दवामुळे खेळपट्टी आणि मैदान ओलसर होते. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून साथ मिळत नाही; तसेच सीमर्सना चेंडू स्विंगही करता येत नाही. त्यामुळे डावांचे विभाजन करण्याची गरज आहे. त्यामुळे दोन्ही संघ कोरड्या आणि ओलसर वातावरणात फलंदाजी आणि गोलंदाजी करतील. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव २५ षटकांनंतर थांबवण्यात येईल. धावांचा पाठलाग करणारा संघ त्यानंतर आपली २५ षटके खेळणार. प्रथम फलंदाजी करणारा संघ त्यानंतरची उर्वरित २५ षटके खेळण्यास सुरुवात करेल. या वेळी पहिल्या २५ षटकांतील डावच पुढे सुरू होईल. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ २५ षटके फलंदाजी करील. यामुळे कोणत्याही संघास प्रतिकूल किंवा अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळणार नाही, असे सचिनने सांगितले.
बॅट आणि चेंडूतील असमानता वाढली आहे, याकडेही सचिनने लक्ष वेधले. वन-डेमध्ये दोन चेंडू वापरले जातात. त्यामुळे सामन्यांची २५ षटके होतात, त्या वेळी चेंडू १२-१३ षटकेच जुना असतो. त्या वेळी चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही. चेंडूची लकाकी गेलेली नसते किंवा तो मऊही होत नाही. त्यातच क्षेत्ररक्षण मर्यादेचा फटकाही गोलंदाजांना बसतो. गोलंदाजांसाठीही आता काही करण्याची वेळ आली आहे. तीस यार्ड वर्तुळात पाच क्षेत्ररक्षक असल्यामुळे फिरकी गोलंदाजांच्या कौशल्यावर मर्यादा आली आहे. ऑफस्पिनरना मधल्या यष्टीच्या रेषेत मारा करणे भाग पडते. त्यामुळे ते फलंदाजास चकवू शकत नाहीत. आम्हाला बचावात्मक माराच करावा लागतो, ही फिरकी गोलंदाजांची खंत आहे, याकडे सचिनने लक्ष वेधले.
सचिन तेंडुलकर म्हणाला…
– कसोटी सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर होण्याची गरज
– सीम गोलंदाजीस साथ देणारी खेळपट्टी चांगली हा ग्रह दूर करण्याची गरज
– नव्या पिढीस खेळात कायम घडामोड हवी असते
– गोलंदाज कायम आव्हान निर्माण करीत असतात. खेळपट्टी प्रतिकूल असेल तर ते बचावात्मक पवित्रा घेणार
– खेळपट्टी साथ देणारी असेल, तर आपल्याला वेगळे काही करण्याची गरज नाही, असा विचार फलंदाजही करतात
– कसोटी हे मूळ क्रिकेट; पण ते कितपत रस निर्माण करते हा विचार करण्याची गरज
– चांगली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देणारीही असू शकते
– जगभरात वेगवेगळ्या चेंडूंनी खेळले जाते, हे आव्हान
– कसोटीत वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर, भिन्न प्रकारच्या वातावरणाचेही आव्हान
राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More