नवी दिल्ली: अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनस झाले. या ऐतिसासिक भूमिपूजनावर सर्व सामान्यापासून ते सिने आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी याबद्दल सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला. पण सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनावर देशभरात आनंद साजरा केला जात असताना एक मोठा वर्ग असा देखील होता ज्याने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेले आणि सध्या खेळणारे अनेक खेळाडू आहेत जे यावर शांत राहिलेत.

वाचा-
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने “मंगल भवन अमंगल हारी…” अशी पोस्ट करत आनंद व्यक्त केला.

तर माजी फिरकीपटू हरभजन सिंग, शिखर धवन आणि मोहम्मद कैफ यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली होती. इतक नव्हे तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने देखील पोस्ट करून हा आनंदाचा दिवस असल्याचे म्हटले होते.

पण मास्टर ब्लास्टर , , सह अनेक दिग्गज खेळाडूंनी यावर मौन धारण केले.

वाचा-
आता ही गोष्टी नेटिझन्सच्या लक्षात येणार नाही तर नवलच. त्यांनी भारताच्या या आजी-माजी खेळाडूंना जोरदार ट्रोल करण्यास सुरूवात केली. विराटने तर त्याच दिवशी लेबनन मध्ये झालेल्या स्फोटाबद्दलची एक मेसेज शेअर केला होता.

भारतीय नेटिझन्सनी पाकिस्तानचा क्रिकेटपटू दानिश कनेरियाने दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्याचे कौतुक केले आहे. काहींच्या मते दानिश पाकिस्तानातून शुभेच्छा देतो. पण भारतातील क्रिकेपटूंना काहीच वाटत नाही. भारतीय सेलिब्रिटिंनी साउड प्रुफ दिवाळी साजरी केली आहे, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.

करोना लॉकडाउन सुरू झाल्यापासून अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. फक्त क्रिकेटच नाही तर ते देश आणि विदेशातील घनटांवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत अशातच राम मंदिराच्या भूमिपूजनावर काहीच न बोलल्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की यांनी मौन का धारण केले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here