मुंबईचा ५५ धावांनी पराभव केल्यानंतर टक्केवारीचा विचार करता किमान २० सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमध्ये हार्दिक पंड्या अव्वल स्थानी असून त्याने २१ पैकी १५ सामन्यात विजय तर ५ मध्ये पराभव स्विकारला आहे. त्याच्या विजयाची टक्केवारी ७५ इतकी आहे. मुंबईवरील विजयासह गुजरातने गुणतक्त्यात ७ पैकी ५ विजयासह १० गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे.
या यादीत धोनी दुसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयाची टक्केवारी ५८.९९ इतकी आहे. धोनीने २१७ पैकी १२८ सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या यादीत रोहित शर्माचा समावेश पहिल्या ५ मध्ये देखील नाही. रोहितच्या विजयाची टक्केवारी ५६.०८ इतकी आहे. रोहितने १४९ पैकी ८३ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. रोहितच्या पुढे सचिन तेंडुलकर, स्टीव्ह स्मिथ, अनिल कुंबळे, ऋषभ पंत आणि शेन वॉर्न हे कर्णधार आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More