नवी दिल्ली : आयपीएल सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काल राडा झाला. हे प्रकरण तापलं आहे. या प्रकरणी एकीकडे आयपीएल व्यवस्थापनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता या सर्व प्रकरणावर विराट कोहलीने सोशल मीडियातून सूचक प्रतिक्रिया दिली आहे. विराटच्या या प्रतिक्रियेनंतर पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जाएंटस यांच्यात काल सामना झाला. या सामन्यानंतर विराट कोहली आण गौतमी गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. दोन्ही संघातील इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्यानेमुळे हा वाद विकोपाला गेला. या सामन्यात आरसीबीनं प्रथम फलंदाजी करत १२७ धावा केल्या होत्या. यानंतर लखनऊचा खेळाडू बाद झाल्यावर विराट कोहली हा आक्रमकपणे जल्लोष करत होता. हे पाहून गौतम गंभीरचा पारा चढला होता.
वादाची सुरुवात लखनऊनचा गोलंदाज नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यातील शाब्दिक वादानंतर झाली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जाएंटस या सामन्यात लखनऊचा पराभव झाला. सामन्यात आरसीबीने लखनऊचा १८ धावांनी पराभव केला. सामना संपल्यावर विराट सर्व खेळाडूंशी हस्तोंदलन करत होता. यावेळी लखनऊचा गोलंदाज नवीन-उल-हक विराट कोहलीशी वाद घालताना दिसला. तर मॅक्सवेलनं हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. कोहली आल्याने वाद आणखी वाढला. हे पाहून लखनऊ सुपरजाएंटसचा मेंटॉर गौतम गंभीरचा पारा चढला. दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. पण गंभीरला लखनऊच्या खेळाडूंनी रोखलं. आणि हा वाद आणखी वाढला नाही. पण मैदानात झालेला हा रडा सर्वांनी बघितला.

Virat Kohli vs Gautam Gambhir: कोण आहे नवीन उल हक? ज्यावरून विराट-गंभीरमध्ये जुंपली; लखनौ-बेंगळुरू मॅचमध्ये हाय वोल्टेज ड्रामा
आता या राड्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर सोशल मीडियातून एक सुविचार शेअर करत अप्रत्यक्षपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘Everything We Hear Is An Opinion, Not A Fact. Everything We See Is A Perspective, Not The Truth. म्हणजेच ‘आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही’ असं विराटने स्टेटसमध्ये म्हटलं आहे.

virat kohli instagram stats

विराट कोहलीचं इन्स्टाग्राम स्टेटस चर्चेत

विराट कोहली गौतम गंभीरला आयपीएलचा दणका,मैदानातील राड्यानंतर व्यवस्थापनाची मोठी कारवाई, चाहत्यांना धक्का
दरम्यान, मैदानावरील या राड्यानंतर आयपीएल व्यवस्थापनाने विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या तिघांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याने मॅच फीच्या १०० टक्के रकमेचा दंड त्यांना बजावण्यात आला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here