मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला १०० टक्के मॅच फी अर्थात १.७ कोटी रुपये, तर गौतम गंभीरला १०० टक्के मॅच फी २५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर या वादात असलेला आणखी एक खेळाडू नवीन-उल-हक याला ५० टक्के मॅच फी १.७९ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हल या तिघांना मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला. हे दंडाचे पैसे त्या खेळाडूंच्या फ्रेंचाइजींना भरावे लागणार आहेत. कोहली आणि गंभीरवर आयपीएलच्या आचारसंहितेचा उल्लंघन केल्याबद्दल मंगळवारी मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला.
मॅच संपल्यानंतरही विराट – गंभीर – नवीन-उल-हलमध्ये धुसफूस
मॅच संपल्यानंतर ज्यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हात मिळवत होते, त्यावेळी लखनौचा गोलंदाज नवीन आणि कोहली यांची बाचाबाची सुरू झाली. हे पाहून आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं.
विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानातच भिडले; मोठी बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल
त्यानंतर गंभीरने कोहलीसोबत बोलत असलेल्या मायर्सला कोहलीशी बोलण्यापासून रोखलं. त्यानंतर लगेच गंभीर कोहलीकडे जाताना दिसतो. त्यावेळी लखनौच्या जखमी झालेल्या केएल राहुलसह इतर खेळाडूंनी त्याला रोखलं. तरीही कोहली आणि गंभीरमध्ये बाचाबाची सुरू होती. मैदानातील गंभीर, कोहली आणि नवीनची ही वागणूक चुकीची असल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More