शास्त्रींच्या मते, कर्णधार रोहित शर्माचा वर्कलोड गेल्या काही वर्षात दुप्पट झाला आहे. धावा करता न आल्याने त्याच्या कर्णधारपदावर परिणाम झालाय. जेव्हा तुम्ही धावा करता तेव्हा कर्णधार म्हणून काम फार सोप होऊन जाते. मैदानावरील तुमची देहबोली बदलते. पण जेव्हा तुम्ही धावा करत नाही तेव्हा मैदानावरील ऊर्जा वेगळी होऊन जाते. तुम्ही कोणीही असला तरी निराश होण्यापासून वाचू शकत नाही.
आयपीएलचा १६व्या हंगाम मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी फार चांगला गेला नाही. १० सामन्यात त्याने १८.३९च्या सरासरीने फक्त १८४ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १२६.८९ इतका आहे. यात तो दोन वेळा शून्यावर बाद झालाय.
हे असे ठिकाण आहे जेथे कर्णधार म्हणून तुमची कामगिरी अधिक महत्त्वाची ठरते. अर्थात रोहितसाठी हंगाम अद्याप संपलेला नाही. जर तो फॉर्ममध्ये परत आला तर टीम आणि त्याच्यासाठी मार्ग सोपे होतील, असेही रवी शास्त्री म्हणाले.
मुंबई इंडियन्सला साखळी फेरीत अजून ४ सामने खेळायचे आहेत. या चारही लढतीत विजय मिळाल्यास त्याचे १८ गुण होतील आणि प्लेऑफमध्ये मधील स्थान देखील निश्चित करता येईल. मात्र जर चार पैकी एकही लढत गमावली तर अन्य संघांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागले.
मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More