आयसीसीने यावर्षी होणारा ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयानंतर आयसीसीने चांगलाच धडा घेतला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी जर भारतात विश्वचषक होऊ शकला नाही, तर त्यासाठीचे पर्याय आता आयसीसीने शोधले आहेत. नेमके हे पर्याय आहेत तरी काय, पाहा….

करोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्यात आला. आयसीसीला ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करायचा नव्हता, पण यजमान देशानेच हात वर केल्यामुळे आयसीसीपुढे कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यामुळे आयसीसीला ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण यापुढे मात्र आता असे होणार नसल्याची काळजी आयसीसीने घेतलेली दिसत आहे.

पुढील वर्षी भारतामध्ये मार्च महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार होता. पण हा ट्वेन्टी-२० विश्वचषक आयसीसीने पुढे ढकलला. आता हा ट्वेन्टी-२० विश्वचषक सप्टेंबरनंतर होणार आहे. पण काही कारणास्तव जर भारतामध्ये हा ट्वेन्टी-२० विश्वचषक होऊ शकला नाही, तर काय करायचे, हे आयसीसीने यापूर्वीच ठरवलेले आहे.

भारतामध्ये जर विश्वचषक खेळवण्यासाठी जर योग्य परिस्थिती नसेल तर, भारतामध्ये ही स्पर्धा होणार नाही. या स्पर्धेची आता पर्यायी व्यवस्था आयसीसीने केली आहे. आयपीएल खेळवण्यासाठी जे दोन देश उत्सुक होते त्यांच्याकडे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल. याचाच अर्थ भारतात स्पर्धा होऊ शकली नाही तर ती युएई किंवा श्रीलंकेमध्ये खेळवली जाऊ शकते. त्यावेळी नेमकी दोन्ही देशांमध्ये कशी परिस्थिती आहे, हे पाहून आयसीसी याबाबतचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे आता पुढच्या वर्षी काही करून ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवायचाच, हे आयसीसीने मनाशी पक्के केलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here