कोहली आणि डु प्लेसिसने गोलंदाजांना घाम फोडला
या सामन्यात १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरू संघाने २ गडी गमावून सामना जिंकला. दुसऱ्या डावात बंगळुरू संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. विराट कोहलीने आरसीबीसाठी ६३ चेंडूत १०० धावांची खेळी केली. तर फाफ डु प्लेसिसने ४७ चेंडूत ७१ धावा केल्या.
या सामन्यात कोहली आणि डु प्लेसिसने १७२ धावांची ओपनिंग पार्टनरशीप केली. त्यांच्यासमोर हैदराबादच्या गोलंदाजांना काहीही करता आलं नाही. या दोघांनी हैदराबाद संघाच्या कुठल्याही गोलंदाजाला सोडलं नाही. भुवनेश्वर कुमारने ४ षटकात १२ च्या इकॉनॉमी रेटने ४८ धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेण्यात त्याला यश आलं.
एक नो-बॉल हैदराबादला महागात पडली
या सामन्यात हैदराबाद संघाला प्लेसिसची विकेट घेण्याची संधी चालून आली होती. डावाच्या ९ व्या षटकातील ५ व्या चेंडूवर डू प्लेसिस झेलबाद झाला. नितीश रेड्डीच्या चेंडूवर मयंक डागरने कॅच पकडला. पण, अंपायरने त्याला हाईट नो-बॉल सांगितलं आणि डु प्लेसिस वाचला.
हा निर्णय हैदराबादसाठी धोक्याचा तर आरसीबीसाठी संजीवनी ठरला. यानंतर डु प्लेसिसने ५० धावा करत ठोकत संघाला विजयाच्या दिशेने नेले. डु प्लेसिसला जीवदान मिळाले तेव्हा तो ४१ धावांवर खेळत होता. नो-बॉल नसता आणि डु प्लेसिस बाद झाला असता तर कदाचित सामन्याचा निकाल हैदराबादच्या बाजूने लागला असता. त्यामुळे या एका नो-बॉलने हैदराबादचा घात केला, असं म्हटलं जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More