धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते.
धोनी एक तपाहून जास्त काळ भारताच्या संघात होता. त्यामुळे तो एवढी वर्षे व्यस्त होता. पण आता निवृत्ती घेतल्यावर मात्र त्याच्याकडे पुरेसा वेळ असणार आहे. पण धोनी हा वेळ वाया नक्कीच घालवणार नाही. कारण आतापर्यंत आयुष्यात ज्या गोष्टींना वेळ देता आला नाही, त्या गोषअटी धोनी करणार आहे.
धोनी आपला अखेरचा सामना गेल्या वर्षी इंग्लंडमधल्या विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर धोनी हा भारतीय आर्मीबरोबर एक महिना सराव करण्यासाठी काश्मीरमध्ये गेला होता. धोनी भारताच्या टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल या पदावर आहे. हे मानद पद धोनीला देण्यात आले आहे. धोनीला भारतीय आर्मीमध्ये रसही आहे. त्यामुळे तो आता भारतीय आर्मीबरोबर राहील, असेही म्हटल जात आहे.
धोनीचा खास मित्र आणि त्याच्या व्यवसायात पार्टनर असलेल्या अरुण पांडेने धोनी निवृत्तीनंतर काय करणार याबाबतचा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, ” धोनी आतापर्यंत क्रिकेटमध्ये फार व्यस्त होता. पण निवृत्तीनंतर त्याला आता बराच वेळ मिळणार आहे. निवृत्तीनंतर खेळाडूंची ब्रँडमधील किंनत कमी होते, असे म्हटले जाते. पण धोनीचे तसे होणार नाही. भविष्यात काय करायचे आहे, हे धोनीला चांगलेच माहिती आहे. एक महिला तो आर्मीबरोबर राहीलेला आहे. त्यामुळे यापुढे आर्मीबरोबरच भविष्यात काही काळ व्यतित करण्याचे धोनीने ठरवले आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I like the valuable information you provide in your articles.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.