नवी दिल्ली: आयपीएल २०२३ चा हंगाम संपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांची लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे लागले आहे. ही लढत येत्या ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. कसोटी क्रमवारीत भारत अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघातील लढत चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.फायनल मॅचसाठी विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनी लंडनमध्ये सराव सुरू केला आहे. कर्णधार रोहित शर्मा काल ३० मे रोजी संघात दाखल झाला आहे. WTCची फायनल रोहित शर्मासाठी खास असणार आहे. रोहितला भलेही त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या १६व्या हंगामात मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळून देता आले नाही. पण आता त्याला WTC फायनल मॅचमध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे.

MS Dhoni : सर्वोत्तम संघ नसताना CSKने विजेतेपद मिळवले; धोनीच्या जेतेपदाची रियल स्टोरी अशी आहे
अंतिम सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर WTC चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरेल. त्याच बरोबर तो भारताच्या अशा कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवेल ज्यांनी आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला आयसीसीचे विजेतेपद मिळवता आले नाही. आता रोहितला ही संधी मिळाली आहे, ज्याने तो विराटला मागे टाकू शकेल.

Dhoni Net Worth: बिझनेस टायकून आहे धोनी; हॉटेल ते एरोस्पेसमध्ये गुंतवणूक, एकूण संपत्ती…

फायनल मॅच आधी रोहित शर्माने संघाचे टेन्शन वाढवले आहे. रोहित शर्माचा फॉर्म फार चांगला नाही. आयपीएलमध्ये त्याने २०.७५च्या सरासरीने ३३२ धावा केल्या आहेत. अर्थात हे अपयश विसरून रोहित दमदार कामगिरी करेल अशी चाहत्यांना आशा आहे. रोहितचा फॉर्म हा काळजीचा विषय असला तरी शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जडेजा या खेळाडूंचा फॉर्म चांगला आहे. इतक नाही तर कसोटी स्टार चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे.


भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद मिळवले तर आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ देखील संपेल. २०१३ ली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा फायनलमध्ये पराभव झाला. तर २०१५ आणि २०१६च्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९च्या वर्ल्डकपमध्येही असेच झाले होते. तर २०२१, २०२२ मधील टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी निराशजनक झाली. २०२१च्या पहिल्या WTC फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं



Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here