नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेने खेळाडूंच्या वेळेवर असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे. त्यामुळे फ्रँचायझी क्रिकेटपेक्षा राष्ट्रीय संघाला महत्त्व देण्यात यावे हे खेळाडूंना पटवून देणे भविष्यात प्रमुख आव्हान असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने व्यक्त केले. कमिन्स म्हणाला की, आयपीएलने एक दशकापूर्वी क्रिकेटचे चित्र बदलले आणि म्हणूनच जगभरातील T20 लीगमध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेटचा करार नाकारण्याच्या ट्रेंट बोल्टच्या निर्णयाशी आपण सहमत असल्याचे कमिन्सने स्पष्ट केले.

७ जूनपासून होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील (WTC) भारताविरूध्दच्या ओव्हल येथील अंतिम सामन्यापूर्वी कमिन्सने सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना सांगितले की, मागील काही काळापासून असे वाटत होते की हे होणारचं आहे आणि आता तसेच होत आहे. कमिन्स म्हणाला आता पूर्वीसारखी खेळांडूंच्या वेळेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मक्तेदारी राहिली नसून एका दशकापूर्वीच आयपीएलने ही मक्तेदारी मोडीत काढायचे काम केले आहे. आता यात अनेक खेळाडू सहभागी होत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आम्हाला देखील याबद्दल सक्रीय होण्याची वेळ आली आहे.

Ajinkya Rahane: संघातून बाहेर होतो तेव्हा… रोहित-द्रविडवर रहाणेचं मोठं वक्तव्य, पाहा काय बोलून गेला
आमच्या खेळाडूंनी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा राष्ट्रीय संघाला प्राधान्य द्यावे अशी माझी इच्छा आहे. पंरतू, सध्याच्या अधिक पैशांच्या फ्रँचायझी आधारित स्पर्धेच्या युगात असे करणे हे अधिकच आव्हानात्मक असणार आहे.आम्हाला ऑस्ट्रेलियासाठी खेळताना शक्य तितका खास खेळ करावा लागेल. हे आमच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल असेही कमिन्स याने सांगितले.

सेलिब्रेशनची अति घाई अन् हातची विकेट गेली

जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमुळे द्विपक्षीय कसोटी मालिकेला अजूनच महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताविरूध्द ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत. तसेच आम्ही भारताला पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचवले होते जे बरेच लोक विसरले आहेत असे म्हणत कमिन्सने भारतीय क्रिकेट संघाला डिवचले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here