नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून चाहते त्यासाठी निरोपाचा सामना घ्या अशी विनंती करत आहेत. धोनीने गेल्या वर्षी वर्ल्ड कप स्पर्धेत सेमीफायनल सामन्यात भारताची ब्लू जर्सी घातली होती. त्यानंतर चाहत्यांना वाटले की तो आयपीएलनंतर पुन्हा भारतीय संघात दिसेल. पण त्याआधीच धोनीने निवृत्तीचा धक्का दिला.

वाचा- वाचा-

आता भारताच्या या सर्वात यशस्वी कर्णधारासाठी फेअरवेल मॅच खेळावी अशी मागणी चाहते करत आहेत. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अशी विनंती बीसीसीआयला केली आहे. अशाच एक मोठी बातमी समोर आली आहे.

वाचा-
भारताचे पंतप्रधान एम एस धोनीला विनंती करू शकतील की त्याने २०२१ चा टी-२० वर्ल्ड कप खेळावा, असा विश्वास पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याला वाटतो.

वाचा-
एका मुलाखतीत शोएब अख्तरला टी-२० वर्ल्ड कप खेळेल असे वाटते का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, हा धोनीची वैयक्तीक निर्णय आहे. पण मला वाटते की, धोनीने टी-२० क्रिकेट खेळावे. त्याने टी-२० वर्ल्ड कप खेळावा. ज्या पद्धतीने भारतात त्याला पाठिंबा मिळतो, प्रेम मिळते त्यावरून त्याने टी-२० वर्ल्ड कप खेळावा. पण हा त्याचा वैयक्तीक निर्णय असेल, असे अख्तर म्हणाला.

वाचा-

धोनीने १५ ऑगस्ट रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एरवी भारतीय खेळाडूंच्या नावाने बोट मोडणाऱ्या पाक खेळाडूंनी धोनीच्या निवृत्तीनंतर मात्र कौतुकाचे पुल बांधले आहेत. इंझमाम-उल-हक, बासित अली, वसीम अक्रम, वकार युनिस, मुदस्सर नजर, शाहित आफ्रिदीसह अन्य खेळाडूंनी धोनीचे कौतुक केले आहे.

वाचा-

माझ्या नजरेत धोनी भारताच्या सर्वात महान फलंदाजांपैकी एक आहे. तो एक खरा सामना विजेता होता. ज्या विरुद्ध खेळताना मला खुप आनंद मिळाला, असे इंझमामने म्हटले. धोनी एक परफेक्ट फिनिशर होता असे राशिद लतीफने म्हटले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here