ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर भारताची अवस्था ४ बाद ७१ अशी दयनीय झाली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरला. जडेजा ४८ धावांवर बाद झाला. त्याआधी भारताला एक मोठा झटका बसला असता पण नशिब चांगले होते म्हणून संघाला धक्का बसला नाही.
चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मैदानात आलेला अजिंक्य रहाणे १७ धावांवर खेळत होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्मधार पॅट कमिन्सच्या एका शानदार चेंडूवर रहाणे LBW झाला. अंपायरने त्याला बाद दिले आणि अंजिक्यने DRS घेण्याचा निर्णय घेतला. याच ठिकाणी अजिंक्यला नशिबाची साध मिळाली आणि पॅट कमिन्सचा गेम झाला.
रिव्ह्यूमध्ये चेंडू टाकताना कमिन्सचा पाय रेषेबाहेर गेल्याचे दिसले, त्यामुळे तो नो बॉल ठरला आणि अजिंक्यला जीवनदान मिळाले. जर बॉल योग्य असता आणि अंपयर्स कॉल घेण्याची वेळ आली असती तर अजिंक्यला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले असते.
अजिंक्यने देखील त्याला मिळालेल्या या जीवनदानाचा फायदा घेतला आणि जडेजासोबत संघाचा डाव सावरण्यास मदत केली. कमिन्सकडून झालेली ही छोटी चूक ऑस्ट्रेलियाला महागात देखील पडू शकते. भारत अद्याप ३१८ धावांनी पिछाडीवर आहे आणि मैदानावर अजिंक्य सोबत केएस भरत आहे.
डावाच्या सुरुवातीला भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी फार निराशा केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना ५० धावांची भागिदारी करता आली नाही. शर्मा १५ तर गिल १३ धावांवर माघारी परतले. गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळणाऱ्या पुजारा १४ धावा करू शकला. तर विराट कोहली देखील फक्त १४ धावा करून माघारी परतला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More