WTC फायनलमध्ये भारत सध्या बॅकफुटवर आहे आणि जर भारताला चॅम्पियन व्हायचे असेल तर इतिहास घडवावा लागेल. याचे कारण म्हणजे लंडनमधील द ओव्हल मैदानावर आजपर्यंत कोणत्याही संघाने इतक्या मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला नाही. या मैदानावर सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी १९०२ साली २६३ धावां करून कसोटी जिंकली होती. तेव्हा देखील ही लढत इंग्लंडने फक्त १ विकेटनी जिंकली होती.
ओव्हल मैदानावरील जर परदेशी संघाच्या कामगिरीचा विचार केला तर ओव्हलवरील विक्रमी विजय वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. त्यांनी १९६३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध २५५ धावांचा पाठलाग फक्त २ विकेटच्या बदल्यात केला होता.
भारतीय संघाला ओव्हल मैदानावर असा विक्रम करण्याची संधी होती. १९७९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील चौथी कसोटी ओव्हलवर होती. तेव्हा भारताला ४३८ धावांचे टार्गेट मिळाले होते. सुनील गावसकर यांनी चौथ्या डावात २२१ धावा केल्या पण टीम इंडियाला ८ बाद ४२९ धावा करता आल्या. त्यामुळे ही लढत ड्रॉ झाली. जर भारताने तेव्हा विजय मिळवला असता तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तो आज देखील सर्वात मोठा धावांचा पाठलाग करुन विजय मिळवल्याचा विक्रम असता. भारताच्या या कामगिरीचा आदर्श रोहित आणि कंपनीला ठेवावा लागणार आहे.
WTC फायनलमध्ये रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने हेड आणि स्मिथ यांच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४५९ धावा केल्या होत्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More