सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहे. मुंबई पोलिसांनी तपास केलेला नसून केवळ चौकशी केली आहे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडे सोपवले आहे. या पुढे या प्रकणात कोणताही एफआयआर दाखल झाल्यास तो सीबीआयच पाहण्याचे काम करेल असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
सुशांतसिंगच्या तपासाबाबत रैनाने एक ट्विट केले आहे. त्याबद्दल रैनाने म्हटले आहे की, ” तुझ्या निधनाने मला बऱ्याच वेदना झाल्य आहेत, हे दु:ख विसरता येऊ शकत नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे की, तुझ्या प्रकरणात सत्याचाच विजय होईल.”
सुशांतसिंगप्रकरणी बबिता फोगटने उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरले होते…याप्रकरणाचा निकाल आल्यावर बबिताने महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. बबिताने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बबिताने म्हटले आहे की, ” सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबाबतचा तपास आता सीबीआय करणार आहे. याप्रकरणी सीबीआय योग्यप्रकारे तापस करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर बिहार पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर ही योग्य असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.