आयपीएलसाठी युएईमध्ये पहिल्यांदा पोहोचण्याचा मान मिळाला तो किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाला. आज दुपारी पंजाबचा संघ दुबईसाठी रवाना झाला होता. पंजाबच्या खेळाडूंनी आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पंजाबनंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ युएईमध्ये दाखल झालेले आहेत.
करोनामुळे काही नियम आता युएईमध्ये पोहोचलेल्या खेळाडूंना पाळावेच लागणार आहे. खेळाडूंना पहिल्यांदा सहा दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. क्वारंटाइनच्या या काळात तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे. करोनाच्या चाचणीमध्ये हे खेळाडू निगेटीव्ह आढळले तर त्याना ‘बायो-बबल’मध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतरच त्यांच्या सरावाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर सराव करतानाही खेळाडूंना काही नियम पाळावे लागणार आहेत.
आयपीएल ही बायो सिक्युएर बबलमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी बरेच कडक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन आता खेळाडूंना करावे लागणार आहे. बायो सिक्युएर बबलमुळे खेळाडू व्हायरसपासून लांब राहतील. मैदान ते हॉटेल हा प्रवास त्यांचा यामुळे सुखकर होणार आहे. पण जर खेळाडूंनी याबाबतचे नियम मोडले तर त्यांना चांगलीच शिक्षा मिळू शकते.
आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना कडक वॉर्निंग दिल्याचे समजते आहे. आयपीएल सुरु झाल्यावर नेमकी जर खेळाडूंकडून चूक झाली किंवा नियम मोडला गेला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही ताकिद दिल्याचे पाहायला मिळत आहे. ही ताकिद फक्त खेळाडूंना देण्यात आलेली नाही, तर खेळाडूंबरोबर कोचिंग स्टाफ, संघ मालक आणि संघाबरोबर असलेल्या सर्व अन्य सदस्यांनाही देण्यात आली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.