करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अजूनही करोनावर औषध सापडलेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपली एक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

वाचा-

करोनामुळे आयसीसीने यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द केली होती. त्यानंतर आशिया चषक ट्वेन्टी-२० ही स्पर्धा करोनामुळे रद्द करावी लागली होती. आता आयसीसीला एक महत्वाची स्पर्धाही करोनामुळे रद्द करावी लागत आहे.

आयसीसीने २०२३ साली भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा फक्त भारतामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा मार्च महिन्यात खेळवण्यात येणार होती, पण ती आता ऑक्टोबर महिन्यात पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरी स्पर्धा खेळवली जाते. ही स्पर्धा आयसीसीने सध्याच्या घडीला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा-

मलेशियामध्ये ३० सप्टेंबर १० ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा होणार होती. पण करोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा आता रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेत मलेशिया, कॅनडा, डेन्मार्क, सिंगापूर, कतारसारखे देश सहभागी होणार होते. पण करोनामुळे आता ही स्पर्धा नियोजित वेळेमध्ये होणार नसल्याचे समोर आले आहे. करोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान आयसीसी कसे भरून काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

वाचा-

आयसीसीच्या आयोजन समितीचे मुख्य अधिकारी ख्रिस टेटली यांनी सांगितले की, ” मलेशियामध्ये सप्टेंबर महिन्यात होणारी क्रिकेट विश्वचषकासाठीची पात्रता फेरीत आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘लीग ए’च्या स्पर्धा नियोजित वेळेत होऊ शकणार नाहीत. खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि चाहते यांची सुरक्षितता आयसीसीसाठी महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांच्या चांगल्यासाठी आम्ही ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here