नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा वेस्ट इंडीजमधील कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील यशानंतर भारतात परतला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया लवकरच आशिया कप खेळणार आहे. या आशिया कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्मा सह कुटुंब आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीच्या दर्शानाला दाखल झाल्याचे फोटो व्हिडिओ समोर आले आहेत. रोहित शर्मासह त्याची पत्नी रितीका आणि मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वेस्ट इंडीजमधील कसोटी आणि एकदिवसीय मालिका पार पडल्यानंतर रोहित शर्मा भारतात दाखल झालेला आहे. रोहित शर्माला टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आलेली आहे. आशिया कप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा सहकुटुंब तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचल्याचं दिसून आलं. रोहित शर्मा यापूर्वी आयपीएलच्या एका हंगामातील अंतिम फेरीतील लढतीपूर्वी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पोहोचला होता.
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची तब्येत जास्तच खराब; संजय शिरसाटांचा दावा, पण मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच खंडन

रोहित शर्मा आगामी काळात आशिया कप स्पर्धा आणि वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. यंदाच्या आशिया कप स्पर्धेची सुरुवात ३० ऑगस्टपासून होणार आहे. आशिया कप स्पर्धेचं संयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आलेलं आहे. पहिली लढत पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहूप्रतिक्षीत लढत २ सप्टेंबरला श्रीलंकेत होणार आहे.
भावानं बहिणीला विजेच्या धक्क्यापासून वाचवलं, त्याचाच पाय तारेवर पडला अन् अनर्थ घडला, बहिणीसमोरच नको ते घडलं..

रोहित शर्मा वनडे वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा नेतृत्व करणार

टीम इंडियानं २०११ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी टीम इंडियाचं नेतृत्त्व महेंद्रसिंग धोनी याच्याकडे होते. रोहित शर्मा त्या संघाचा भाग नव्हता. २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपच्या संघात तो सहभागी होता. २०१५ आणि २०१९ मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा संघाचा भाग होता. त्या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद पटकावता आलं नव्हतं. रोहित शर्मा यंदा प्रथमच टीम इंडियाचं वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत तरी भारताला विजेतेपद मिळून गेल्या १२ वर्षांचा दुष्काळ संपणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Thane News: ठाण्यात धक्कादायक घटना: पालिका रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here