नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम करोना व्हायरसमुळे युएईत १९ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी सर्व ८ संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि जैव वातावरणात ६ दिवस राहिल्यानंतर आता त्यांनी सराव सुरू केला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपर्यंत सर्व काही ठीक सुरू असताना अचानक चेन्नई सुपर किंग्ज संघाचा उपकर्णधार सुरेश रैनाने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

रैनाने अचानक आयपीएल न खेळता स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला. रैनाने वैयक्तीक कारणामुळे भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता असे कारण समोर आले हते. पण आता यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संघाचे मालक एन.श्रीनिवासन यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

वाचा-
सुरेश रैनाने या वर्षी आयपीएल न खेळता पुन्हा भारतात परत येण्याच्या निर्णयावर श्रीनिवासन म्हणाले, रैनाच्या डोक्यात यश गेले आहे. रैनाच्या आयपीएल सोडण्यावर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यापैकी एक म्हणजे संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाल्याने तो घाबरला होता आणि त्यामुळेच त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरे कारण म्हणजे रैनाला हॉटेलमधील रुम खराब मिळाली होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष असेलल्या एन श्रीनिवासन यांनी वरील दोन्ही गोष्टींना दुजोरा दिला आहे. हॉटेल रूमवरून रैना आणि संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्यात वाद झाला होता. धोनीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण रैनाने त्याचे ऐकले नाही आणि आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला.

वाचा-
रैनाने अचानक संघ सोडल्याने धक्का बसला आहे. पण कर्णधार धोनीने स्थिती सांभाळून घेतली आहे. क्रिकेटपटू जुन्याकाळात रमलेल्या अभिनेत्या प्रमाणे असतात. पण चेन्नई सुपर किंग्ज एक कुटुंबाप्रमाणे आहे आणि सर्व वरिष्ठ खेळाडू एकत्र राहण्यास शिकले आहेत असे एन श्रीनिवासन यांनी आउटलूक या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

रैनाच्या प्रकरणातून संघ बाहेर पडला आहे. जर तुम्ही आनंदी नसाल तर माघारी जाऊ शकता. मी कोणावर काहीही करण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. अनेक वेळा यश तुमच्या डोक्यात जाते, असे श्रीनिवासन म्हणाले. धोनीने मला विश्वास दिला आहे की करोना झालेल्यांची संख्या वाढली तरी काळजी करण्याचे कारण नाही. त्याने सर्वांसोबत झूम कॉल करून चर्चा केली आहे.

वाचा-
मला विश्वास आहे की रैना पुन्हा परत येईल. तो परत यावा अशी इच्छा आहे. अजून स्पर्धा सुरू झालेली नाही. त्याला याची कल्पना नक्कीच असेल की तो ११ कोटी रुपये सोडून गेला आहे.

पठानकोट येथे एका नातेवाइकाचा दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने रैना आयपीएल सोडून गेल्याचे वृत्त होते.

काय आहे प्रकरण
२१ ऑगस्ट रोजी सीएसकेचा संघ दुबईला पोहोचला होता. तेव्हापासून रैना त्याला मिळालेल्या हॉटेलमधील रुमबद्दल नाराज होता. त्याला करोना संदर्भातील प्रोटोकॉल कठोर हवा होता. रैनाला धोनी प्रमाणे रुम हवी होती. रैनाला मिलालेल्या रुमध्ये बाल्कनी ठिक नव्हती. त्यातच संघातील जलद गोलदाज दीपक चाहर आणि विकेटकिपर ऋतुराज गायकवाड सह अन्य १३ जणांना कोरना झाला. त्यामुळे रैना घाबरला आणि भारतात परतला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here