नवी दिल्ली: संघाचा उपकर्णधार सुरेश रैनाने वैयक्तीक कारणामुळे या वर्षी खेळणार नसल्याचे सांगितले आणि तो युएईमधून भारतात परतला. रैनाच्या या निर्णयामुळे सर्व जण हैराण झाले. एका नातेवाइकाचा दरोडेखोरांनी खून केल्याने तो भारतात परतल्याचे वृत्त समोर आले होते. पण नंतर रैनाचे आयपीएल सोडण्याचे कारण वेगळेच असल्याचे समोर आले.

काहीच दिवसांपूर्वी सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या रैनाने दुबईत त्याच्या संघातील दोन खेळाडूंसह १३ जणांना करोना झाल्याचे समजल्यानंतर भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. चेन्नई संघातील दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरना झाला आहे. त्याच बरोबर दुबईत ज्या हॉटेलमध्ये रैना थांबला होता तेथील रुम संदर्भात त्याची तक्रार होती. रुमवरून त्याचा वाद देखील झाला होता. त्यातच करोना रुग्ण सापडल्यामुळे तो घाबरला आणि या वर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला.

वाचा-
आयपीएलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसकेच्या नियमानुसार कोच, कर्णधार आणि मॅनेजर यांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी सूट दिले जातात. तरी देखील रैनाला सूट देण्यात आला होता. फक्त त्याच्या रुममध्ये बाल्कनी नव्हती इतकाच प्रश्न होता.

आयपीएल सोडून भारतात परत जाण्या इतका हा मोठा विषय नव्हता. संघात करोना रुग्ण आढळले आहेत यापेक्षा कोणता विषय मोठा असू शकतो का? सध्याची परिस्थितीत पाहता २०२१ साली सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये रैना चेन्नई संघातून बाहेर होऊ शकतो. जर रैना या हंगामात पुन्हा संघात आला तर परिस्थिती बदलू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

वाचा-
रैना या वर्षी आयपीएल खेळणार नाही, हे सीएसकेकडून अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. पण यामुळे रैना पुन्हा चेन्नईच्या यलो जर्सीमध्ये दिसणार नाही असे समजते. अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्या संघ व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडल्या नाहीत.

अशी शक्यता फार कमी आहे की ज्या खेळाडूने निवृत्ती घेतली आहे. तो अन्य कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नाही आणि त्याला सीएसकेमध्ये संधी मिळेल. तो पुन्हा आयपीएलच्या लिलावात सहभागी होईल आणि अन्य एखादा संघ त्याला विकत घेईल. संघाने ऋतुराज गायकवाडवर मोठी बोली लावली होती. क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा संघात येईल अशी आशा आहे.

वाचा-
सीएसके संघाने अद्याप रैनाच्या बदली अन्य खेळाडूची मागणी केली नाही. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रैनाने जैव सुरक्षा वातावरणाचे उल्लंघन केले होते. या प्रकरणी रैनाने माफी मागितली तरी त्याचा खास परिणाम होणार नाही. कारण संघ व्यवस्थापन भविष्याचा विचार करत आहे.

वाचा-
रैनाच्या माफीनाम्याबद्दल फार माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पण संघ भविष्यासाठी ऋतुराजला तयार करत आहे. धोनी आणि मुख्य कोच फ्लेमिंग त्यानुसार रणनिती तयार करत आहेत. रैनाने चेन्नईकडून १६४ सामन्यात ४ हजार ५२७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here