वाचा-
चेन्नईच्या संघातील काही व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याने बीसीसीआयने त्यांना काही अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणे करून ते सध्याच्या संकटातून बाहेर पडू शकतील. आता चेन्नईचा संघ स्पर्धेतील पहिला सामना खेळणार नाहीत. पण चेन्नई संघावर आलेल्या या संकटामुळे बीसीसीआयने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सीएसके संघाला थोडा वेळ मिळेल. कारण सीएसकेच्या खेळाडूंना क्वारंटाइनमधून बाहेर आल्यावर सराव करायला थोडा वेळ लागणार आहे.
वाचा-
आधी ठरल्यानुसार सीएसके संघ त्यांचा सराव २८ ऑगस्ट रोजी सुरू करणार होता. पण आता पूर्ण संघाचा क्वारंटाइन कालावधी ६ दिवसाचा वाढवण्यात आला आहे. तर जे लोक करोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. संबंधित लोक तेव्हाच जैव सुरक्षित वातावरणात येऊ शकतील जेव्हा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील.
वाचा-
आयपीएलची सलामीची लढत जबरदस्त व्हावी, असे बीसीसीआयला वाटत आहे. मुंबई इंडियन्स हा एक संघ सलामीसाठी सज्ज झालेला आहे. पण चेन्नईचा संघ मात्र सलामीच्या लढतीत खेळताना दिसणार नाही. सीएसकेऐवजी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने सलामीच्या लढतीत सहभाग घ्यावा, असा प्रयत्न बीसीसीआय करत असल्याचे समजते आहे. कारण एका संघात रोहित आणि दुसऱ्या संघात विराट कोहली असेल तर पहिल्या लढतीला जास्त चांगला प्रतिसाद मिळेल, असे बीसीसीआयला वाटत आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएलची सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times