वाचा-
आयपीएलमधील आठ संघ युएईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाली होती. स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या होणार आहे. कारण हे दोन्ही संघ गतविजेते आणि उपविजेते आहेत. पण चेन्नई संघातील अन्य खेळाडूंची करोना चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहण्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करण्याचे टाळले. चेन्नईच्या खेळाडूंची सलग दुसरी चाचणी नेगेटिव्ह आल्यामुळे आता पहिला सामना ठरल्यानुसार मुंबई विरुद्ध चेन्नई असाच होईल.
आयपीएलचे आयोजन करताना वातावरणाचा विचार करणेही महत्वाचे असते. युएईमध्ये सर्वात जास्त उष्ण वातावरण हे अबुधाबी येथे आहे. त्यामुळे अबुधाबी येथे बीसीसीआयला जास्त सामने खेळवायचे नाहीत. कारण अबुधाबीला जास्त सामने खेळवले तर त्याचा विपरीत परीणाम खेळाडूंवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यासाठी वेळ लागत असल्याचे म्हटले जात आहे. पण चाहत्यांना मात्र आयपीएलच्या वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहीलेली होती.
वाचा-
आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात बीसीसीआयला काही समस्या जाणवत होती. पहिली गोष्ट तर करोनाचं संकट तर आहेच. पण त्याचबरोबर सर्वात युएईमध्ये सध्याच्या घडीला उष्म वातावरणार आहे. त्यामुळे कडक गर्मी जाणवत आहे. त्यामुळेच खेळाडूंनी दुपारी सराव न करण्याचाही निर्णय घेतला आहे.
वाचा-
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआने सात समालोचक निश्चित केले आहेत. यात सुनिल गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोपडा, रोहन गावसकर आणि हर्षा भोगले यांचा समावेश आहे. हे सर्व जण १० सप्टेंबर रोजी युएईला रवाना होतील. समालोचक दोन गटात विभागले जातील एक गट दुबई आणि शारजाह येथे तर दुसरा अबूधाबी येथे थांबणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times