बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला आहे. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयातील अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. त्यानंतर याप्रकरणी देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटने आता या प्रकरणात उडी घेतली आहे. त्याचबरोबर कंगना उद्धव ठाकरे सरकारला घाबरणार नाही, असंही तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

कंगनाबाबत बबिताने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ” उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ज्याप्रकारे कंगना राणावतचे ऑफिस तोडले आहे, त्यावरून एक गोष्ट समजते की, उद्धव ठाकरे सरकार घाबरलेली आहे. त्यांची हे वाईट विचार आता सर्व देशापुढे आले आहेत. त्यांना काय वाटतं, असं करून ते कंगनाला घाबरवतील, तिला शांत बसवतील? पण तसे होणार नाही. कारण कंगना ही घाबरणारी नाही.”

कंगना आपल्या व्हिडीओमध्ये पुढे म्हणाली की, ” संपूर्ण भारत कंगनाच्या पाठिशी उभा आहे. मी सर्व देशवासियांना अपील करते की, आपल्या या बहिणीची ताकद कमी होऊ देऊ नका. नाही तर यापुढे कोणत्याही बहिणीला आपली बाजू मांडण्याची हिंमत करणार नाही. मला एक गोष्ट कळत नाही. मुंबईतील काही लोकं एखादी वाईट गोष्ट घडली तर रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन येतात, आज ती लोकं का शांत आहेत. त्यांनी ही गोष्ट समोर होताना दिसत नाही. या गोष्टीचे उत्तर उद्धव ठाकरे सरकारला नक्कीच हिंदुस्थान देईल.”

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली भारताची महिला कुस्तीपटू गीता फगटनेही यामध्ये उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना कंगनाचे ऑफिस तोडू शकते, पण तिची हिम्मत नाही, असे गीताने म्हटले आहे. गीताने याबाबत ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. गीताची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. गीताच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट्ही आल्या आहेत. काही जणांमी गीताला ट्रोल केले आहे तर काही जणांनी गीताची बाजू घेतल्याचेही पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये गीताने लिहिले आहे की, ” ज्याची काठी त्याचीच म्हैस, असेच चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. पण तुम्ही कंगना राणावतचे ऑफिस तोडू शकता, पण तिची हिंमत तोडू शकत नाही.”

कंगनाने उद्धव ठाकरेंना काय सुनावलं, पाहा…‘उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझं घर तोडलं आणि मोठा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. वेळेचं चक्र आहे, कोणासाठीही नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली. मी या देशाला वचन देतेय की, मी केवळ अयोध्या नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागरिकांना जागरुक करणार. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here