मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयातील अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. त्यानंतर याप्रकरणी देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटने आता या प्रकरणात उडी घेतली आहे.
बबिताने याबाबत एक ट्विट केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहे. कंगना राणावतचे प्रकरण पाहता महाराष्ट्रामध्ये खुलेआम लोकशाहीची हत्या करण्यात आल्याचे बबिताने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बबिताने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” महाराष्ट्रामध्ये काल खुलेआमपणे लोकशाहीची हत्या करण्यात आली.” बबिताचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी बबिताला या ट्विटनंतर पाठिंबाही दिला आहे, तर काही जणांनी बबितावर टीकाही केली आहे.
कंगना उद्धव ठाकरे सरकारला घाबरणार नाही, असंही तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. कंगनाबाबत बबिताने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ” उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ज्याप्रकारे कंगना राणावतचे ऑफिस तोडले आहे, त्यावरून एक गोष्ट समजते की, उद्धव ठाकरे सरकार घाबरलेली आहे. त्यांची हे वाईट विचार आता सर्व देशापुढे आले आहेत. त्यांना काय वाटतं, असं करून ते कंगनाला घाबरवतील, तिला शांत बसवतील? पण तसे होणार नाही. कारण कंगना ही घाबरणारी नाही.”
कंगना आपल्या व्हिडीओमध्ये पुढे म्हणाली की, ” संपूर्ण भारत कंगनाच्या पाठिशी उभा आहे. मी सर्व देशवासियांना अपील करते की, आपल्या या बहिणीची ताकद कमी होऊ देऊ नका. नाही तर यापुढे कोणत्याही बहिणीला आपली बाजू मांडण्याची हिंमत करणार नाही. मला एक गोष्ट कळत नाही. मुंबईतील काही लोकं एखादी वाईट गोष्ट घडली तर रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन येतात, आज ती लोकं का शांत आहेत. त्यांनी ही गोष्ट समोर होताना दिसत नाही. या गोष्टीचे उत्तर उद्धव ठाकरे सरकारला नक्कीच हिंदुस्थान देईल.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times