मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. पण त्यानंतर अनुभवी अंबाती रायुडू आणि फॅफ ड्यु प्लेसिस यांनी संघाचा डाव फक्त सावरला नाही तर त्यांनी विजयाचा मार्गही बनवला. रायुडूने यावेळी अर्धशतक झळकावत चेन्नईच्या संघाला विजयासमीप पोहोचवले. रायुडूला यावेळी सुरेख साथ मिळाली ती फॅफची. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचत विजय संघाच्या दृष्टीपथात आणला.
रायुडूने यावेळी ४८ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रायुडू बाद झाल्यावर फॅफने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, कारण मैदानात तो चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. फॅफने यावेळी अर्धशतक पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. रोहित शर्माने या हंगामाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. पण .रोहितला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. कारण रोहिताला यावेळी दोन चौकारांच्या जोरावर १२ धावाच करता आल्या. चेन्नईच्या संघात नव्याने दाखल झालेल्या पीयुष चावलाने यावेळी रोहितला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. पण रोहित बाद झाल्यावरही सलामीवीर क्टिंटन डीकॉकने जोरदार फटकेबाजी सुरु ठेवली होती. डीकॉकने २० चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या जोरावर ३३ धावा केल्या. डीकॉकला चेन्नईचा गोंदाज सॅम कुरनने शेन वॉटसनकरवी झेल बाद केले.
मुंबई इंडियन्सकडून पुनरागमन करणाऱ्या सौरभ तिवारीने यावेळी जोरदार फटकेबाजी केली. तिवारीला यावेळी चांगली साथ हार्दिक पंड्या देत होता. तिवारीने यावेळी ३१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४२ धावा केल्या, तिवारीचे अर्धशतक यावेळी फक्त आठ धावांनी हुकले. तिवारी बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी हार्दिकच्या खांद्यावर आली होती. हार्दिक त्यानंतर धडाकेबाज फलंदाजी करायला सुरुवात करेल, असे सर्वांना वाटले होते. पण यावेळी हार्दिकला १० चेंडूंमध्ये दोन षटकारांच्या जोरावर १४ धावाच करता आल्या.
हार्दिक बाद झाल्यावर कृणाल पंड्या आणि किरॉन पोलार्ड हे किती जलदगतीने धावा जमवतात, याची उत्सुकता चाहत्यांना होती. कृणाल आणि पंड्या हे दोघेही धडाकेबाज फलंदाज असल्यामुळे ते संघाला किती धावा जमवून देतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण कृणाललाही यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी यावेळी पोलार्डवर येऊन ठेपलेली होती. पण पोलार्डला यावेळी १८ धावाच करता आल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times