नवी दिल्ली: IPL 2020 आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिल्या हायव्होल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला शानदार विजय मिळून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या () वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण त्याच बरोबर सर्व जण गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात रायडू ऐवजी निवड समितीने विजय शंकरची निवड केल्याबद्दलचा मुद्दा उचलला आहे. रायडू खऱ्या अर्थाने चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

वाचा-
भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगने देखील याबद्दल ऐकवले आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत रायडूने ७१ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला १६३ धावांचे लक्ष्य गाठता आले. रायडू आणि डु प्लेसिस यांनी केलेली भागिदारी चेन्नईसाठी महत्त्वाची ठरली. आम्ही एक चांगली सुरूवात केली आहे आणि यापुढेही अशीच रहावी.

वाचा-
दोन वर्षापूर्वी आम्ही आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा देखील पहिल्या सामन्यात आम्ही मुंबईचा पराभव केला होता. ही एक सकारात्मक घटना असून या वर्षीही आम्ही विजेतपद मिळू, असे हरभजन म्हणाला.

वाचा-
स्पोर्ट्स तक सोबत बोलताना हरभजन म्हणाला, रायडूचे जितके कौतूक कराल तितके कमीच आहे. वर्ल्ड कपचा संघ निवडताना त्याच्यावर अन्याय झाला. तो संघात हवा होता. त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, तो किती चांगला खेळू शकतो.

वाचा-

मुंबईने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रायडूने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार मारले. डुप्लेसिससह त्याने तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची महत्त्वाची भागिदारी केली. ही भागिदारी चेन्नईच्या विजयाचा पाया ठरली. रायडू जवळपास १० महिन्यांनी म्हणजे ३०७ दिवसांनी मैदानावर परतला होता. त्याने याआधी अखेरचा सामना सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत खेळला होता. हैदारबाद आणि छत्तीसगड यांच्यात १७ नोव्हेंबर २०१९ रोजी हा सामना झाला होता.

वाचा-

मी लॉकडाउनच्या काळात सराव केला होता. उत्सुकता वाढवणारी सुरूवात होती. जेव्हा दव पडण्यास सुरूवात झाली, तेव्हा फलंदाजी थोडी सोपी झाली. या हंगामासाठी आम्ही चेन्नई आणि दुबईत जोरदार सराव केल्याचे रायडू म्हणाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here