दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात पहिल्या शतकाची नोंद झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने धमाकेदार शतकी खेळी केली. राहुलने फक्त ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. या खेळीत त्याला बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने दोन वेळा जीवनदान दिले. विराटने त्याचे दोन कॅच सोडले. या कॅचची मोठी किमती त्यांना द्यावी लागली. पंजाबने प्रथम फलंदाजी करत ३ बाद २०६ धावा केल्या.

वाचा-
पंजाबविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बेंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या १० षटकात पंजाबला फार संधी दिली नाही. पण त्यांच्यावर नियंत्रण देखील मिळवले नाही. १० षटकात पंजाबने १ बाद ९० धावा केल्या होत्या. या काळात राहुलने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र त्याने अधिक आक्रमक खेळ केला.

वाचा-
-RCB समोर २०७ धावांचे आव्हान

विराट कोहलीने राहुलला ८३ धावांवर जीवनदान दिले. त्यानंतर पुन्हा ८९ धावांवर विराटने अगदी सोपा कॅच सोडला. या दोन्ही जीवनदानाचा राहुलने चांगलाच फायदा घेतला. त्याने आक्रमकपणे बॅटिंग केली. राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १९१.३० इतका होता.

पंजाबने अखेरच्या ४ ओव्हरमध्ये ७४ धावा लुटल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here