मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया () यांच्यातील पहिला वनडे सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याआधी रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यापैकी कोणा दोघांची निवड करायची अशा प्रश्न () समोर होता.

शिखर धवन (Shikhar Dhawan ) काही काळ दुखापतीमुळे संघाबाहेर होता. तेव्हा संधी मिळालेल्या राहुलने (K. L. Rahul) दमदार कामगिरी केली. त्यानंतर शिखर धवन दुखापतीतून बाहेर आल्याने संघात आला तेव्हा रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली होती. धवनने पुनगरागमन शानदार केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणाला संधी द्यायची असा प्रश्न विराटसमोर होता.

वाचा-

सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदे जेव्हा विराटला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, संघहिताच्या दृष्टीने शिखर, रोहित आणि राहुल यांना खेळव्याचा निर्णय झाल्यास मी स्वत: चौथ्या क्रमांकवर खेळेन. सलामीच्या जोडीसाठी संघात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी विराटनेच मार्ग काढण्याचे ठरवले होते.

वाचा-

ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्यक्षात सामना सुरू झाल्यानंतर विराटने तिघांना संधी दिली आणि तो स्वत: चौथ्या क्रमांकावर आला. रोहित शर्मा १० धावांवर बाद झाल्यानंतर कोहलीने स्वत:ची जागा राहुलला दिली.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here