मुंबईने नाणेफेक जिंकून यावेळी आरसीबीच्या संघाला प्रथम फलंदाजी करणयासाठी आमंत्रित केले. पण त्यानंतर आरसीबीच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले फिंचला यावेळी ९ धावांवर असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने जीवदान दिले. या जीवदानाचा चांगलाच फायदा फिंचने यावेळी उचलल्याचे पाहायला मिळाले. फिंचने जीवदान मिळाल्यावर मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. फिंचने यावेळी ३५ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली.
फिंच आणि देवदत्त यांनी यावेळी संघाला ८१ धावांची सलामी दिली. फिंच बाद झाल्यावर देवदत्तने दमदार फलंदाजी करत संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. देवदत्तने मुंबईविरुद्ध ४० चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. दोन्ही अर्धशतकवीर बाद झाल्यावर मैदानात एबी डीव्हिलियर्सचे वादळ आल्याचे पाहायला मिळाले. डीव्हिलियर्सने यावेळी अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
मुंबई आणि आरसीबी या महत्वाच्या लढतीत रोहितकडून एक चूक झाली. रोहितने आरसीबीचा सलामीवीर आरोन फिंचचा एक झेल सोडला आणि तो मुंबईला चांगलाच महागात पडला. फिंचने तिसऱ्या षटकातील चेंडू हा मिड विकेटला टोलवला होता. त्यावेळी रोहित शर्मा तिथे उभा होता आणि तो हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण रोहितला हा झेल पकडता आला नाही आणि त्याने फिंचला जीवदान दिले.
या जीवदानाचा चांगलाच फायदा फिंचने उचलला. कारण फिंचचा झेल जेव्हा रोहितने सोडला तेव्हा तो ९ धावांवर होता. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये फिंचला मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण या सामन्यात फिंचला जीवदान मिळाले आणि त्याने ५२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच रोहितने सोडलेला झेल मुंबईला चांगलाच महागात पडल्याचे म्हटले जात
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times