मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सर्वबाद २५५ धावा केल्या. भारताकडून शिखर धवन आणि केएल राहुल या जोडीने शतकी भागीदारी केली. १० धावा करून बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने स्वत: येण्या ऐवजी राहुलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. राहुल आणि धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या भागीदारीत धवनने ७४ तर राहुलने ४७ धावा केल्या. धवन-राहुल जोडीने वनडेमध्ये केलेली ही दुसरी शतकी भागीदारी ठरली.

धवन-राहुल यांनी १२१ धावांची भागीदारी केली. वनडे क्रिकेटमध्ये या दशकातील ही पहिली शतकी भागीदारी ठरली आहे. या दोघांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताला २५५ धावांपर्यंत मजल मारता आली. धवन आणि राहुल या दोघांनाच मोठी धावसंख्या करता आली. रोहित १०, कर्णधार विराट कोहली १३, श्रेयस अय्यर ४ धावांवर बाद झाले. तळातील फलंदाजांपैकी जडेजा आणि पंत यांनी अनुक्रमे २८ आणि २५ धावा केल्या.

वाचा-

या सामन्यात रोहित केवळ १० धावा करून बाद झाला असला तरी त्यांने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सर्वात वेगाने १ हजार धावा केल्या.

वाचा-

रोहितने घरच्या मैदानावर १८ डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ हजार धावा केल्या. यासाठी सचिन आणि विराट यांनी १९ डाव खेळले होते. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने ३० डावात १ हजार ५६१ धावा केल्या आहेत. तर विराटने १९ डावात १ हजार ३२ धावा.

वाचा-

शतकांचा विचार केल्यास घरच्या मैदानावर सचिनने ऑस्ट्रेलिविरुद्ध चार, विराटने पाच तर रोहितने तीन शतक केली आहेत.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here