वाचा-
स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल अव्वल स्थानी आहे. त्याने २०२० मधील पहिले शतक देखील केले होते. फक्त जर कर्णधारांच्या कामगिरीचा विचार करायचा झाला तर अन्य कर्णधार त्याच्या जवळपास देखील नाहीत. धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही म्हणून टीका केली जात आहे. तर रोहित शर्मा सलामीला येवून देखील तो दोन डावात अपयशी ठरलाय. विराटला तीन सामन्यात फक्त २९ धावा करता आल्या.
वाचा-
राहुलची स्फोटक फलंदाजी
केएल राहुलने आतापर्यंत ३ सामन्यात २२२ धावा केल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात १३२ धावा केल्या होत्या. IPL २०२० मधील पहिले शतक त्याच्या नावावर आहे. त्याने २३ चौकार आणि ९ षटकार मारले होते.
वाचा-
स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर
राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने दोन सामन्यात ११९ धावा केल्या आहेत.
रोहितचे अर्धशतक
पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध अपयशी ठरल्यानंतर रोहितने दुसऱ्या सामन्यात कोलकाताविरुद्ध ८० धावा केल्या होत्या. पण तिसऱ्या सामन्यात तो पुन्हा अपयशी ठरला. ३ सामन्यात रोहितने १०० धावा केल्या आहेत. यात एका डावातील ८० धावांचा समावेश आहे. त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारलेत.
वाचा-
धोनी कधी खेळणार
दिग्गज कर्णधारांमध्ये धोनीचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर घेतले जाते. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यात त्याने ४४ धावा केल्या आहेत. त्यापैकी एका सामन्यातील २९ धावांचा समावेश आहे.
वाचा-
विराट सर्वात मागे
बेंगळुरूने ३ सामने खेळले आहेत आणि या तिनही सामन्यात विराट अपयशी ठरला. त्याने फक्त २९ धावा केल्या आहेत. मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने सर्वोच्च १८ धावा केल्या होत्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times