वाचा-
मुंबईने पंजाबला १९२ धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण जसप्रित बुमराहने पाचव्या षटकात मयांकची बोल्ड घेतील आणि पंजाबच्या डावाची घसरण सुरू झाली. त्यानंतर क्रुणार पंड्याने करुण नायरची विकेट घेतील. पंजाबच्या ६० धावा झाल्या असताना चाहरने राहुलची विकेट घेत सामना मुंबईच्या बाजूने झुकवला.
वाचा-
राहुल बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यामुळे पंजाबला विजयाची अशा होती. पण ही जोडी फार टीकली नाही. पूरन ४४ धावा तर मॅक्सवेल ११ धावांवर बाद झाला.
वाचा-
त्याआधी पंजाबचा कर्णधार केएल राहुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे सुरुवातीला दिसून आले कारण मुंबईची अवस्था २ बाद २१ अशी केली होती. पहिल्याच षटकात कॉर्टेलने डीकॉकला शून्यावर बाद करत मुंबईला धक्का दिला. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना सुर्यकुमार यादव बाद झाला. त्यानंतर गेल्या सामन्यातील हिरो इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागिदारी केली.
वाचा-
मुंबईने विकेट गमवल्या नाहीत पण धावसंख्या फारच धिमी होती. ती वाढवण्याचा प्रयत्न करताना इशान किशन २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहितने आयपीएलमधील ३८वे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर तो गोलंदाजांवर तुटून पडला. ७० धावा करून रोहित माघारी परतला. त्याने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावा केल्या. १७ षटकात मुंबईने ५ बाद १२९ धावा केल्या होत्या पण त्यानंतर हार्दिक पंड्या आणि पोलार्डने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यांनी अखेरच्या ५ षटकात ८९ धावा केल्या. यामुळे मुंबईने २० षटकात १९१ धावांपर्यंत मजल मारली.
मुंबईकडून पोलार्डने २० षटकात ४७ तर हार्दिकने ११ चेंडूत ३० धावा केल्या. या दोघांनी अखेरच्या ३ षटकात ६२ धावा काढल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times