भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी हा धक्कादायक आणि सर्वात वाईट असा पराभव ठरला आहे. भारतीय संघाकडून या सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि खुद्द विराट कोहली खेळत होते. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह हा मुख्य गोलंदाज होता. विराट आयसीसी क्रमवारीत पहिल्या तर रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. तर बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर. कोणताही सामना फिरवण्याची क्षमता या तिघांमध्ये आहे आणि असे असताना भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला.
वाचा-
पाचव्यांदा भारत १० विकेटनी हरला
वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारत पाचव्यांदा १० विकेटनी हरला. याआधी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने कोलकातामध्ये १० विकेटनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारताला १० विकेटनी हरवले आहे.
वाचा-
कोणत्या कर्णधाराने १० विकेटनी पराभव स्विकारला
१९८१- न्यूझीलंड, मेलबर्न (सुनिल गावस्कर)
१९९७- वेस्ट इंडिज, ब्रिजटाउन (सचिन तेंडुलकर)
२०००- दक्षिण आफ्रिका, शारजाह (सौरव गांगुली)
२००५- दक्षिण आफ्रिका, कोलकाता (राहुल द्रवीड)
२०२०- ऑस्ट्रेलिया, वानखेडे (विराट कोहली)
भारताने दिलेले विजयासाठीचे छोटे लक्ष्य पार करताना वॉर्नर आणि फिंच यांनी जसप्रीत बुमराहविरुद्ध सहज धावा केल्या. सुरूवातीला बुमराहने त्यांना अडचणीत आणले होते. पण दुसऱ्या बाजूने मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्या गोलंदाजीवर त्यांनी धावा केल्या. कुलदीपची गोलंदाजी खेळताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला त्रास झाला. वॉर्नर आणि फिंच यांनी मारलेले अनेक चेंडू हवेत उडाले पण ते अशा ठिकाणी पडले जेथे फिल्डर नव्हता.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News