नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( 2019 ) बुधवारी २०१९च्या पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारात तिघा भारतीयांचा सन्मान करण्यात आला. रोहित शर्माला ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इअर, तर दीपक चहर याला टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार जाहीर झाला. भारताचा कर्णधार () याला (spirit of cricket) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विराटला हा पुरस्कार जाहीर होण्यामागे एक घटना कारणीभूत ठरली आहे.

गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात साखळी फेरीत सामना झाला होता. या सामन्यात विराटने एक इशारा केला होता आणि त्याच इशाऱ्याने विराटने जगभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली होती. आयसीसीने विराटच्या या क्रिकेट प्रेमाचा सन्मान केला आहे.

वाचा-

काय झालं होतं

आयसीसी वर्ल्ड कप २०१९मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील साखळी फेरीतील सामना ओव्हल येथे झाला होता. या सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करत असताना काही क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथला चिडवत होते. स्मिथला २०१८च्या मार्च महिन्यात बॉल टॅपरिंग केल्या प्रकरणी एका वर्षासाठी निलंबित केले होते. स्मिथसह डेव्हीड वॉर्नर याच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती. या बंदीनंतर दोघांनी वर्ल्ड कपमध्ये संघात पुनरागमन केले होते.

वाचा-

क्रिकेट चाहते स्मिथला चिडवत होते. हा प्रकार विराटला आवडला नाही. त्याने चाहत्यांकडे इशारा केला आणि सांगिले की स्मिथला चिडवण्या ऐवजी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. विराटने स्टेडियममधील चाहत्याना रोखले. विराटच्या या इशाऱ्यानंतर चाहते देखील शांत झाले आणि त्यांनी स्मिथसाठी टाळ्या वाजवल्या.

वाचा-

विराटने चाहत्यांना केलेला इशारा स्मिथने पाहिला आणि त्याने विराटचे आभार देखील मानले. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. विराटचे मैदानावरील हे वर्तन क्रिकेटच्या प्रत्येक चाहत्याचे मन जिंकून गेले.

वाचा-

बुधवारी २०१९ची घोषणा झाली तेव्हा विराटचे नाव स्पिरीट ऑफ क्रिकेट या पुरस्कारासाठी जाहीर झाले. आयसीसीने विराट हा क्रिकेटचा खरा खुरा स्पिरीट असल्याचे म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ विराटचा तो खास व्हिडिओ-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here