आतापर्यंत कार्तिकने एकही ट्वेन्टी-२० सामना खेळलेला नाही. त्यामुळे आज तो थेट उतरला तो मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाबरोबर. पण या सामन्यातील पहिल्याच षटकात त्याने पहिला बळी मिळवला आणि आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईचे रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक हे दोन्ही सलामीवीर धडाकेबाज फलंदाजी करत होते. त्यामुळे राजस्थानला यावेळी विकेट मिळवण्याची गरज होती. त्यावेळी राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने त्यागीच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. पाचवे षटक टाकत असताना तिसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माने त्याला षटकार लगावला. पण त्यानंतरही त्यागी बिथरला नाही. पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने मुंबईचा सलामीवीर डीकॉकला बाद केले आणि आपल्या संघाला पहिले यशही मिळवून दिले.
दोन्ही संघातील अखेरचे पाच सामने– राजस्थानचा ५ विकेटनी विजय
– राजस्थानचा ४ विकेटनी विजय
– राजस्थानचा ७ विकेटनी विजय
– राजस्थानचा ३ विकेटनी विजय
– मुंबई इंडियन्सचा ८ धावांनी विजय
या वर्षी दोन्ही संघांची कामगिरी शानदार झाली आहे. कामगिरीचा विचार करता राजस्थान रॉयल्सचे पारडे जड वाटत आहे. पण शारजामधील पहिल्या दोन लढतीत धमाकेदार फलंदाजी केल्यानंतर दुबई आणि अबुधाबीमध्ये राजस्थानची कामगिरी निराशजनक झाली आहे. यामुळेच राजस्थान या सामन्यात बदल करण्याची शक्यता आहे. या उलट मुंबई इंडियन्सची कामगिरी या दोन मैदानावर चांगली झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्की असेल. त्याचबरोबर हा सामना जिंकून मुंबईच्या संघाला अव्वल स्थानावर जाण्याचीही संधी असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times