ही गोष्ट घडली ती मुंबई इंडियन्स गोलंदाजी करत असेलल्या सातव्या षटकात. हे कृणालचे दुसरे षटक होते. पहिल्या षटकात कृणालने दिल्लीच्या अजिंक्य रहाणेला बाद केले होते. त्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकातही तो चांगली गोलंदाजी करत होता. त्यावेळी या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक फटका मारला आणि चेंडू हार्दिकच्या हातामध्ये होता. त्यावेळी श्रेयस हा एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि त्याने आपले क्रीझही सोडले होते. त्यावेळी श्रेयसला आपण धावचीत करू शकतो, असे हार्दिकला वाटले. त्यामुळे हार्दिक चेंडू पकडून कृणालकडे टाकण्याचा प्रयत्नामध्ये होता. त्यावेळी कृणालने आपल्याकडे चेंडू टाकू नको, असे ओरडून सांगितले. पण हार्दिकने यावेळी चेंडू कृणालच्या दिशेने फेकला.
हार्दिकने आपल्या दिशेने टाकलेला चेंडू पकडण्याच्या तयारीत कृणाल नव्हता. कारण यापूर्वीच त्याने तसे सांगितले होते. त्यामुळे हार्दिकने टाकलेला चेंडू हा यष्ट्यांना न लागता पुढे गेला. हा चेंडू पकडण्यासाठी कोणीही दुसरा खेळाडू तिथे नव्हता. त्यामुळे जिथे एकही धाव नव्हती, तिथे दिल्लीने दोन धावा घेतल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक आणि कृणाल यांच्या भांडणात यावेळी दिल्लीला धावांचा बोनस मिळाल्याचे पाहायला मिळाले.
आजचा सामना रोहित शर्मासाठी असेल महत्वाचा, कारण…रोहितने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले तर तो आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरेल. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ही सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहेत. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये वॉर्नरने ४६ अर्धशतके झळकावलेली आहेत.
रोहितला या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये रोहितने दोन अर्धशतके लगावली आहे. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये रोहितने ३५.१६ च्या सरासरीने २११ धावा केल्या आहे, याटवेळी रोहित स्ट्राइक रेट १४५.५१ एवढा आहे. त्यामुळे रोहितला सातत्यपूर्ण फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित नेमका कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times