शारजा: आयपीएलच्या १३व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत होणार आहे. पंजाबने आतापर्यंत फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे तो म्हणजे बेंगळुरू विरुद्ध होय. या सामन्याआधी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने एक अजब मागणी आहे.

जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये आणि एबी डिव्हिलियर्सचा समावेश होतो. या दोघांची जोडी २०११ पासून बेंगळुरू कडून खेळत आहे. आतापर्यंत या जोडीने अनेक विजयी भागिदारी करून संघाला जिंकून दिले आहे. या वर्षी बेंगळुरू संघाने सात पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळ आहेत.

वाचा-

बुधवारी एका इस्टाग्राम चॅट दरम्यान किंग्ज इलेव्हनचा कर्णधार केएल राहुलने गंमतीने सांगितले की, आयपीएलच्या आयोजकांनी आता विराट कोहली आणि यांच्यावर बंदी घातली पाहिजे. राहुलला विचारण्यात आले होते की, टी-२० स्पर्धेत कोणता बदल केला पाहिजे. त्यावर त्याने हे उत्तर दिले.

सर्व प्रथम मला वाटते की आयपीएलने पुढील वर्षी एबी आणि विराटवर बंदी आणावी. एकदा तुम्ही एका खास टप्प्यावर पोहोचता त्यानंतर लोकांनी म्हटले पाहिजे की आता बास करा. या दोघांनी ५ हजार धावा केल्या आहेत. आता खुप झाले. तुम्ही आता इतर खेळाडूंना काम दिले पाहिजे, असे राहुल गंमतीने म्हणाला.

वाचा-

आयपीएल २०२०च्या गुणतक्त्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाबचा संघ सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. अनेक सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांचा पराभव झालाय. दिल्ली विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकाता विरुद्ध फक्त दोन धावांनी त्यांना विजयाने हुलकावणी दिली. त्या पराभवानंतर राहुल म्हणाला होता की माझ्याकडे शब्द नाहीत की आमचा का पराभव झाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here