वाचा-
आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात प्लेऑफमध्ये पोहोचण्याची समीकरणे बदलत आहेत. सध्या बेंगळुरूचा संघ चांगल्या परिस्थितीत आहे. त्यांनी ९ पैकी ६ मध्ये विजय मिळवत १२ गुण मिळवले आहेत. आज विजय मिळवला तर त्यांचे १४ गुण होतील आणि प्ले ऑफमधील स्थान जवळ पास निश्चित होईल.
वाचा-
विजय मिळाला तर बेंगळुरूसाठी चांगलेच ठरेल पण जर पराभव झाल तर मात्र त्यांच्या अडचणी वाढतील. एक पराभव बेंगळुरूच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या अडचणी वाढवतील. कारण प्रत्येक संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या स्पर्धेत आहे. RCBला अजून ४ सामने खेळायचे आहेत. आजच्या सामन्यानंतर त्यांची लढत चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली यांच्या विरुद्ध लढत होणार आहेत.
वाचा-
काय आहे प्लेऑफचे समीकरणवाचा-
दिल्ली संघाकडे १० पैकी ७ विजयासह १४ गुण आहेत. त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरू या संघांकडे ९ पैकी ६ विजयांसह १२ गुण आहेत. पंजाबने दिल्लीविरुद्ध विजय मिळवल्याने प्लेऑफसाठीची स्पर्धा अधिक रंजक झाली आहे. सलग तीन विजय मिळवणाऱ्या पंजाबने पुढील सर्व सामने जिंकले तर त्यांचे १६ गुण होतील. त्यामुळे बेंगळुरुसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times