दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज रविवारी डबल हेडरमधील पहिली लढत विरुद्ध ( vs ) यांच्यात होणार आहे. ११ पैकी ८ सामन्यात पराभव झालेला चेन्नईचा संघ जवळ जवळ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.

वाचा-

चेन्नईला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पुढील तिनही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची गरज आहे. त्यानंतर देखील अन्य संघांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागणार. या उटल बेंगळुरूने १० पैकी ७ विजय मिळवून १४ गुणांसह गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे. प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी आजचा विजय उपयोगी पडू शकतो.

वाचा-

आयपीएल २०२० मध्ये या दोन्ही संघात झालेल्या लढतीत बेंगळुरूने ३७ धावांनी विजय मिळवला होता. एकूण लढतीचा विचार केल्यास चेन्नई १५ विरुद्ध ९ ने पुढे आहे. पण या वर्षी चेन्नई फॉर्ममध्ये नसल्याने या आकड्यांना फार महत्त्व नाही.

वाचा-

फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आदी सर्वच बाबतीत चेन्नईचा संघ संघर्ष करत आहे. धोनीने युवा खेळाडूंच्यात स्पार्क दिसत नाही असे वक्तव्य केले होते ज्यावर टीका झाली होती. त्यानंतर मुंबई विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि नारायण जगदिशन यांना अंतिम ११ मध्ये संधी दिली. पण दोघेही शून्यावर बाद झाले. सॅम करनच्या अर्धशतकामुळे मुंबईविरुद्ध चेन्नईचा लाज वाचली. २१ धावांवर ५ विकेट गेल्यानंतर सॅम करनमुळे चेन्नईला ११४ पर्यंत पोहोचता आले. मुंबईने ११५ चे आव्हान १० विकेट राखून मिळवले. आयपीएलमध्ये प्रथमच चेन्नईचा १० विकेटनी पराभव झाला.

चेन्नई विरुद्ध विजय मिळवून विराटला प्ले ऑफमधील स्थान पक्के करता येईल. गुणतक्त्यात बेंगळुरूसोबतच दिल्ली आणि मुंबईचे प्रत्येकी १४ गुण आहेत. नेट रनरेटमुळे विराट तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे विराटला नेट रनरेट सुधारण्याची संधी आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here