बेंगळुरू: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत जखमी झाल्यामुळे केएल राहुलने यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडली. तिसऱ्या सामन्यात देखील विराटने राहुलकडेच ही जबाबदारी सोपावली. मालिका विजयानंतर राहुलच्या भूमिकेबद्दल बोलताना विराटने यापुढे तो संघात फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून असेल असे स्पष्ट केले.

विराटच्या या विधानामुळे आता संघातून ऋषभ पंतचा पत्ता कट होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. राहुलने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याला बाद केले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात देखील राहुलने यष्टीरक्षकाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. राहुलचे कौतुक करताना विराट म्हणाला, संघाची गरज आणि संतुलन राखण्यासाठी ज्या प्रमाणे २००३च्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत राहुल द्रवीडने भूमिका पार पाडली होती. तशीच भूमिका राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यात पार पाडली.

वाचा-

भविष्यात संघातमध्ये काही बदल करणार का याबद्दल बोलताना विराटने कोणताच बदल करणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही सलग दोन सामने जिंकले आहेत. संघात कोणताही बदल न करता सर्वोत्तम कामगिरी केल्याचे विराटने सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलने यष्टीरक्षक आणि फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली होती.

वाचा-

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीकरत भारतासमोर २८७ धावांचे आव्हान दिले. भारताकडून रोहित शर्माने ११९, विराट कोहलीने ८९ तर श्रेयस अय्यरने नाबाद ४४ धावांची खेळी करत विजयाचे लक्ष्य १७ चेडू आणि ७ गडी राखून पार केले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here